उन्हाळ्यात Food poisoning झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे, उलट्या- जुलाब थांबण्यासाठी करा घरगुती उपाय
उलट्या जुलाब होण्याची कारणे?
डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी उपाय?
उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा का होते?
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये तापमानात सतत काहींना काही बदल होत असतात. वाढत्या गर्मीमुळे हानिकारक विषाणूंची झपाट्याने वाढ होते. तसेच उष्णता वाढल्यानंतर अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अन्नपदार्थांमध्ये विषाणूची पातळी वाढते. घरी शिजवलेल्या पदार्थांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यास जेवणाला बुरशी लागते. तसेच खराब झालेल्या पदार्थांमध्ये ‘साल्मोनेला’ किंवा ‘ई-कोलाय’ यांसारखे हानिकारक विषाणू वाढतात. बऱ्याचदा भूक लागल्यानंतर किंवा तहान लागल्यास उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा पाणी, सरबत प्यायले जाते. पण दूषित पाण्याचे आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अन्नावाटे हानिकारक विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्यानंतर शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात.(फोटो सौजन्य – istock)
अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे क्षार झपाट्याने कमी होतात. वारंवार उलट्या किंवा जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. सतत होणाऱ्या उलट्या, जुलाबाकडे दुर्लक्ष केल्यास रक्तदाबाची पातळी झपाट्याने कमी होऊन खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात अन्नपदार्थांचे सेवन करणे पथ्य पाळणे फार आवश्यक आहे. आहारात कोणत्याही तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते. चला तर जाणून घेऊया उलट्या- जुलाब थांबण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर तापमानात खूप जास्त वाढ होते. यामुळे अन्नातील ओलावा जिवाणूंना आकर्षित करतो आणि अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. अन्नपदार्थांमध्ये तयार झालेले हानिकारक जिवाणू शरीराच्या पचनसंस्थेवर तर काहीवेळा मेंदूच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे मिळेल तिथले पाणी प्यायले जाते. याच दूषित पाण्यामुळे कॉलरा किंवा टायफॉइडचा धोका वाढतो. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय रस्त्यावरील बर्फाचे गोळे, कापलेली फळे किंवा सरबत प्यायल्यामुळे विषाणू वाढण्याचा धोका जास्त असतो.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरातील पाणी संतुलित ठेवणे फार आवश्यक आहे. कारण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होते. त्यामुळे नियमित ४ ते ६ लिटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाणी, ओआरएस पाणी प्यावे. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम युक्त घटक जुलाबावाटे बाहेर पडून गेलेली क्षारांची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. तसेच दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. ताकात असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची पातळी वाढवतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Ans: अस्वच्छ किंवा खराब अन्न खाल्ल्यामुळे होणाऱ्या संसर्गाला फूड पॉइझनिंग म्हणतात.
Ans: उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप, अशक्तपणा आणि डिहायड्रेशन ही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: उष्णतेमुळे अन्न लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात.






