जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार
किडनीच्या आजारांची लागण का होते?
जास्त वेळ लघवीला न गेल्यास उद्भवणाऱ्या समस्या?
किडनीसंबंधित आजार कोणते?
दीर्घकाळ निरोगी आणि कायमच हेल्दी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकते याशिवाय असंख्य कामे किडनी करते. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा ऑफिसमधील मीटिंग, लांबचा प्रवास, शाळा कॉलेजमध्ये वॉशरूम नसल्यामुळे लघवीला जाण्यास मिळत नाही. शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. तर काहीवेळा जास्त काम असल्यामुळे लघवीला जाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे लघवी थांबवून ठेवली जाते. पण सतत लघवी थांबवून ठेवल्यामुळे किडनीसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. पण जास्त वेळ लघवी थांबून ठेवल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी तसेच साचून राहतात. लघवी कधी करावी हे संकेत शरीर कायमच देत असते. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवणे हे किडनी, ब्लॅडर आणि पूर्ण यूरिनरी सिस्टीमसाठी घातक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यामुळे शरीराला कोणत्या गंभीर आजारांची लागण होते. किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
किडनी शरीरातील रक्त स्वच्छ करण्यासाठी सतत लघवी तयार करते. पण ज्यावेळी लघवी रोखून ठेवली जाते, तेव्हा ती यूरिन ब्लॅडरमध्ये जमा होते. हा दबाव जास्त काळ राहिल्यास किडनीवर जास्तीचा तणाव येतो. किडनीवर आलेल्या जास्तीच्या तणावामुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते. लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन, बॅक्टेरिया आणि अतिरिक्त मीठ बाहेर पडून जाते. त्यामुळे लघवी रोखून धरल्यास विषारी घटक शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे हळूहळू किडनी निकामी होते आणि रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.
जास्त वेळ लघवीला न गेल्यास त्यातील बॅक्टेरिया बाहेर पडून जाण्याऐवजी तसेच साचून राहतात. मूत्रमार्गात वाढलेल्या इन्फेक्शनचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच लघवीला झाल्यानंतर योग्य वेळी लघवीला जावे. यूटीआयची लागण झाल्यानंतर लघवीमध्ये जळजळ, पुन्हा पु्न्हा तहान लागणे, लघवी कमी येणे, लघवीतून दुर्गंधी, पोट किंवा कंबर दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. महिलांना प्रामुख्याने युटीआय इन्फेक्शनचा धोका असतो.याशिवाय किडनी स्टोन, ब्लॅडरचे स्नायू कमजोर होणे, किडनी डॅमेज होणे इत्यादी अनेक गंभीर आजार होतात.
Ans: पाय, घोटा किंवा चेहऱ्यावर सूज येणे, लघवीच्या सवयींमध्ये बदल
Ans: रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनीला इजा होते.
Ans: तीव्र (Acute) किडनी इंजरी वेळेवर औषधोपचार केल्यास बरी होऊ शकते. मात्र, क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) पूर्णपणे बरा होत नाही.






