सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी काय खावे?
पचनक्रिया बिघडण्याची कारणे?
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. पण आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून न गेल्यास पोट फुगल्यासारखे वाटते. याशिवाय पचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. ऍसिडिटी, मळमळ, उलट्या, डोकेदुखी इत्यादी बरीच लक्षणे दिसून येतात. आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित शरीर स्वच्छ होणे आवश्यक आहे. पोट व्यवस्थित साफ न झाल्यास शरीरात जडपणा जाणवू लागतो. बिघडलेली पचनक्रिया वारंवार शरीरावर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारात सतत होणारे बदल, व्यवस्थित झोप न होणे, रात्री कधीही जेवणे, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ आतड्यांमध्ये कुजलेला मलमऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. यामुळे पचनक्रिया सुधारते. सकाळी पोट साफ होण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचा आहारात समावेश करावा.
सकाळी उठल्यानंतर जर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर बडीशेपचे पाणी प्यावे. बडीशेपमध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. यासाठी पाणी गरम करून त्यात बडीशेप टाकावी आणि उकळवून घ्या. तयार केलेले पाणी थंड झाल्यानंतर उपाशी पोटी सेवन करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास पचनाच्या समस्या कधीच उद्भवणार नाहीत.
वाढलेले वजन कमी करण्यापासून ते अगदी पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा लिंबाच्या रसाचे सेवन केले जाते. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. तब्येत चांगली ठेवण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन केले जाते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातात आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.
अंथरुणावर पडल्यानंतर लागेल शांत झोप! नियमित करा ‘ही’ योगासने, शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल
दैनंदिन आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर असलेले पदार्थ शरीरातील घाण बाहेर पडून जाते. उपाशी पोटी सकाळच्या नाश्त्यात पपई, पेरू किंवा इतर वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीर स्वच्छ होते. कायम हेल्दी राहण्यासाठी फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
Ans: सतत पोटाच्या समस्या (गॅस, बद्धकोष्ठता, डायरिया), थकवा, त्वचेवर पुरळ उठणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा
Ans: दही, ताक, लोणचे, इडली-डोसा, केळी, सफरचंद, पालक, गाजर आणि बेरी
Ans: आतडे आणि मेंदू यांचा थेट संबंध असतो, ज्यामुळे भावनांचा पोटावर परिणाम होतो. ताणतणावामुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते।






