सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण
पाणी पिण्याची योग्य पद्धत?
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
नियमित किती प्रमाणात पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहात होणे फार आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे पोटात जडपणा, ऍसिडिटी वाढणे तर काहीवेळा आंबट ढेकर येऊन संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी कोमट पाणी प्यावे. चहा, कॉफीमध्ये असलेले कॅफिन रिकाम्या पोटी शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढवते, ज्याच्या परिणामामुळे संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. ज्यामुळे नियमित उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी पाणी प्यावे.(फोटो सौजन्य – istock)
शरीराला ६ ते ७ तासांच्या शांत झोपेनंतर चहा कॉफीची नाहीतर कोमट पाणी पिण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्री झोपल्यानंतर घामावाटे आणि श्वासोच्छवासामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शरीरात नैसर्गिकरित्या थकवा किंवा डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर १ ग्लास पाणी आवर्जून प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि शरीरातील पाण्याचे संतुलन कायम टिकून राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत? याबद्दल सविस्तर माहिती.
रात्रीच्या जेवणानंतर सकाळी उठेपर्यंत कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जात नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाईट्स कमी होऊन जातात, ज्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. सकाळी उठल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. पण उठल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट होते. याशिवाय पाण्याचे संतुलन कायम टिकून राहण्यास मदत होते. डॉक्टरांच्या मते, शरीरात पाण्याची थोडीशी सुद्धा कमतरता निर्माण झाल्यास मानसिक संतुलन बिघडून स्मरणशक्ती आणि मूडवर परिणाम होतो.
रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीरात थर्मोजेनेसिस नावाची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. तसेच सकाळी उठल्यानंतर 500 ml पाणी प्यायल्याने शरीराचा ऊर्जा खर्च30 ते 40 मिनिटांत 30% पर्यंत वाढू लागतो. ज्याच्या परिणामामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात. दिवसभर कायमच फ्रेश आणि आनंदी राहण्यासाठी उठल्यानंतर आवर्जून पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच त्वचा आणि केसांना भरमसाट फायदे होतात. पाणी केवळ तहान भागवण्यासाठी नाहीतर संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त प्रभावी मानले जाते.
वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. पण असे न करता सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, वारंवार अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित कोमट पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर १ किंवा २ कप पाणी प्यावे. किडनीचे आजार, हृदयविकार, ॲसिड रिफ्लक्स किंवा सूज येणे इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पाण्याचे सेवन करावे.
Ans: कोमट पाणी पिल्याने पचन सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम वाढतो.
Ans: साधारणतः 2 ते 3 लिटर पाणी पिणे योग्य मानले जाते, मात्र व्यक्तीच्या वजन, हवामान आणि शारीरिक क्रियेनुसार हे बदलू शकते.
Ans: हळूहळू, घोट-घोट पाणी पिणे चांगले. एकदम जास्त पाणी पिणे टाळावे.






