• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 4000 Crore Scam In Mumbai Market Committee Allegation Of Mla Mahesh Shinde Nrdm

मुंबई बाजार समितीत ४००० कोटींचा घोटाळा; आमदार महेश शिंदे यांचा आरोप

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१४ मध्ये तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडाचा गैरवापर करून ४६६ गाळ्यांची विनापरवानगी बांधकाम करून त्याची परस्पर विक्री केली आहे. हा घोटाळा १३७ कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे , मात्र प्रत्यक्षात हा घोटाळा ४००० कोटींचा आहे, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2024 | 01:11 PM
मुंबई बाजार समितीत ४००० कोटींचा घोटाळा; आमदार महेश शिंदे यांचा आरोप
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१४ मध्ये तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडाचा गैरवापर करून ४६६ गाळ्यांची विनापरवानगी बांधकाम करून त्याची परस्पर विक्री केली आहे. हा घोटाळा १३७ कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे , मात्र प्रत्यक्षात हा घोटाळा ४००० कोटींचा आहे, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

या संदर्भात तत्कालीन संचालकांनी उच्च न्यायालयामध्ये या विषयासंदर्भात ना हरकत आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देऊन पणन संचालकांना संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असेही शिंदे म्हणाले.

आमदार शिंदे पुढे म्हणाले, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या गैरव्यवहाराची माहिती आपण मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपणास योग्य वाटेल ती भूमिका घ्यावी, असे सांगितल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या शेती माल विक्रीसाठी ७२ हेक्टरचा भूखंड वितरित करण्यात आला होता. त्यापैकी काही भूखंडावर ४६६ गाळे विनापरवानगी बांधण्यात आलेत. एक गाळा एक हजार स्क्वेअर फुट असून रेडी रेकनरप्रमाणे त्याची किंमत नऊ कोटी असताना हे गाळे पाच लाख रुपये किंमतीने विकण्यात आले. हे गाळे तत्कालीन संचालक व व्यापारी यांनाच विकण्यात आले. प्राप्त माहितीनुसार एकाच कुटुंबामध्ये १३० गाळ्यांचे वितरण केल्याची धक्कादायक माहिती आहे.

त्कालीन चेअरमन, संचालकांकडून घोटाळा

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते, त्यावेळी त्यांनी पणन संचालकांना चौकशीच्या आदेश दिले होते. तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी तत्कालीन बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळसकर, संचालक शशिकांत शिंदे, प्रदीप खोपडे, संजय पानसरे, बापू भुजबळ यांच्यासह अन्य संचालकांनी हा घोटाळा केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

२०१३-१४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन बोर्डे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती व अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात १३८ कोटींचा अपहार झाला असून, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, अशी शिफारस अहवालात केली आहे. मात्र हा अहवालावर सुद्धा तत्कालीन संचालकांनी स्थगिती आणली आहे.

शेतकऱ्यांना गाळे द्यावेत हीच आमची भूमिका

ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याची जागा उपलब्ध होती, त्या ठिकाणी चटई क्षेत्रात गाळे बांधून त्यामध्ये चार हजार कोटींचा घोटाळा केला आहे. मार्केट कमिटीची जागा ही इंडस्ट्रियल क्षेत्र म्हणून दाखवण्यात आले, मात्र मार्केट कमिटी जागा औद्योगिक क्षेत्र असूच शकत नाही. रेडी रेकनरचे किंमत नऊ कोटी रुपये असताना नाम मात्र पाच लाखात गाळे कसे विकले जाऊ शकतात असा सवाल त्यांनी केला.

१९ मार्च २०२४ रोजी हायकोर्टाने पणन संचालकांना या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी हे गाळे ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना द्यावेत व यासंदर्भात जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. तत्कालीन संचालकांनी या प्रकरणी कोर्टात जाऊन ना हरकत आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र हायकोर्टाने संबंधित प्रकरणात स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याबाबतचे आदेश दि. १२ एप्रिल रोजी दिले आहेत. संबंधित संचालकांकडून गाळे काढून घेऊन ते शेतकऱ्यांना द्यावेत, हीच आमची भूमिका असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.

Web Title: 4000 crore scam in mumbai market committee allegation of mla mahesh shinde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 01:11 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Mahesh Shinde

संबंधित बातम्या

Nashik Politics: नाशिकचं राजकारण तापणार; भाजपचे मिशन १०० प्लस तर एकनाथ शिंदे स्वबळावर
1

Nashik Politics: नाशिकचं राजकारण तापणार; भाजपचे मिशन १०० प्लस तर एकनाथ शिंदे स्वबळावर

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
2

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur Accident: चंद्रपूरमध्ये दुर्गादेवी विसर्जनात जनरेटरचा स्फोट; दोन महिलांसह सात जण जखमी

Chandrapur Accident: चंद्रपूरमध्ये दुर्गादेवी विसर्जनात जनरेटरचा स्फोट; दोन महिलांसह सात जण जखमी

आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या, आणखी दोन गुन्हे दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या, आणखी दोन गुन्हे दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

IPO Market: ऑक्टोबरमध्ये ग्रे मार्केटचे सर्व रेकॉर्ड मोडतील, उत्पन्न 5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त होण्याची शक्यता

IPO Market: ऑक्टोबरमध्ये ग्रे मार्केटचे सर्व रेकॉर्ड मोडतील, उत्पन्न 5 अब्ज डॉलर पेक्षा जास्त होण्याची शक्यता

नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…

नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर

टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.