बुलढाणा : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल चोरटे चोरत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर, हा माल शेतकऱ्यांच्या शेतातून चोरणाऱ्या सराईत टोळीला बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ३० लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपीला जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपीमध्ये फारुख शहा मेहबूब शहा, शाहरुख उर्फ रहमान शहा, शेख जहांगीर शेख हमजा या तिघांचा समावेश आहे. तर, हे तिघेही अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलीस दलाने दिली आहे.
[read_also content=”देऊळगावमही येथील शेतकऱ्यांचे थेट राष्ट्रपतींना निवेदन, गांजा पिकावरील बंदी उठविण्याची मागणी https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/deulgaon-mahi-farmers-direct-statement-to-president-demand-to-lift-ban-on-cannabis-crop-nraa-230380.html”]
आज ३ फेब्रुवारीला या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना दिली आहे. या सराईत गुन्हेगारांकडून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात शेतमालाची चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, चिखली, मेहकर, जानेफळसह विविध ठिकाणी त्यांनी चोरी केली आहे. या सर्व प्रकाराची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.






