नांदेडमध्ये जनगणनेची तयारी पूर्ण होत आली असून २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे (फोटो - istcok)
Nanded News : सेलू : देशाच्या आगामी जनगणनेचे बिगुल वाजले असून, सेलू तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील ९४ गावांमध्ये येत्या १६ मे पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना १ मे पासून मोबाईलद्वारे स्वतःची माहिती स्वतःच भरण्याची (स्व-गणना) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१ मे पासून ‘स्व-गणना’ पोर्टल सुरू जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत घर गणना करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कर्मचारी घरी येण्यापूर्वी, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती ऑनलाईन नोंदवता येणार आहे. ही सुविधा नागरिकांचा वेळ वाचवणारी ठरणार आहे. तालुक्यातील १४ गावांमध्ये जनगणनेचे काम सुळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. गटांची रचनाः अंदाजे ९५० ते १०,००० लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे तालुक्यात एकूण २०३ गट तयार करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत.
हे देखील वाचा : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
मनुष्यबळः आदेशानुसार २२१ प्रगणक आणि त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ३४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. राखीव फौजफाटाः तातडीच्या गरजेसाठी २० प्रगणक आणि ३ पर्यवेक्षक राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रशिक्षणः या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ४ फिल्ड ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण २५८ कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. जनगणनेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील कार्यालयात विशेष ‘जनगणना कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.
जनगणना कक्षासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक
तहसीलदार तथा चार्ज अधिकारी डॉ. शिवाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथक कार्यरत राहणार आहेः सहाय्यक चार्ज अधिकारीः नायब तहसीलदार गजानन इनामदार, जनगणना सहाय्यकः हरीष टाक व विकास मुपडे, लिपिक व तांत्रिक सहाय्यकः सचिन गायकवाड व निखिल कांबळे, जनगणना कक्ष शिपाईः राम साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर
सुविधेचा लाभ घ्यावा
सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सेलू तालुक्यातील घर गणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान न्वालणार आहे. नागरिकांनी १ मे पासून उपलब्ध होणाऱ्या ‘स्व-गणना’ सुविधेचा लाभ घ्यावा आणि प्रशासकीय कर्मचा-यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे.






