भाजीपाल्याचे दर कडाडले, चाराही महागला (Photo Credit - X)
तीव्र उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने भाजीपाल्याची पिके जळून खाक होत आहेत. परिणामी, शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी भाजीपाल्याची आवक १० ते १२ टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी आणि लिंबू गायब झाले आहे.
ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्रतेमुळे हिरवा चारा नष्ट झाला आहे. वाळलेला चारा आणि मका कुट्टीचे दर प्रचंड वाढले असून, जालना जिल्ह्यासारख्या शेजारील भागातून चारा आणावा लागत आहे. ट्रॅक्टरने कडबा कुट्टी आणण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनातही घट झाली आहे.
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता, जिल्हा उपआयुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी पशुपालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
वाढत्या महागाईमुळे किरकोळ बाजारात भाजीपाला विकणे कठीण झाले आहे. “उन्हामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत, पण ग्राहकांकडून दोन-पाच रुपये नफा कमावणेही आता अवघड झाले आहे,” अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेते संताजी सातपुते यांनी दिली आहे.






