सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका (Photo Credit- X)
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर इतक्या वेगाने हालचाली होतील असे वाटले नव्हते. “अजित पवारांची राख सावडण्याचा विधी झाल्यानंतर लगेच सुनेत्रा पवार मुंबईला जातात आणि शपथ घेतात, या गोष्टी मनाला पटणाऱ्या नाहीत. शासकीय दुखवटा देखील तीन दिवसांचा असतो, तो संपण्यापूर्वीच या घडामोडी घडल्या. यात थोडा वेळ द्यायला हवा होता,” असे शिरसाट यांनी नमूद केले.
Maharashtra Politics: “… मन अक्षरशः भरून येतंय”; DCM होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
शिरसाट यांनी या परिस्थितीला दुर्दैवी ठरवत म्हटले की, राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात माणसापेक्षा खुर्चीला अधिक महत्त्व दिल्याचे हे चित्र आहे. “राजकारणात खुर्ची जिंकली पण माणुसकी हरली, असे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेला या गोष्टी अजिबात भावलेल्या नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) घेतलेल्या या निर्णयावर शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केले. “हा निर्णय का आणि कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला, यावर जरी प्रश्नचिन्ह असले तरी हा निर्णय झाला आहे हे सत्य आहे. पण यामुळे लोकांच्या मनात चुकीचा संदेश गेला आहे,” असेही ते म्हणाले.






