! छ. संभाजीनगरमधील 'या' शिक्षकाच्या पराक्रमावर सीईओंची मोठी कारवाई (Photo Credit- AI)
जि.प. सदस्या दीपाली राजपूत यांनी सदरील प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. त्या म्हणाल्या, पांगरा जि.प. शाळेतील शिक्षक भगवान बोराडे हे शाळेत सतत गैरहजर असतात. ते अर्जीत रजेवर असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र सीईओ यांनी, चौकशीची गरज नसल्याचे सांगून केंद्रप्रमुखांचे वेतन कापण्याचे आणि कन्नड पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी मो. सबाहन नईमोद्दीन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शुक्रवारी जिल्हा परिषदेत बोलाविण्याचे आदेश सीईओ मिन्नू यांनी दिले.
शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांची दुर्दशा झालेली आहे. देभेगावअंतर्गत येणाऱ्या केसापूर येथील शाळा, अंगणवाड्यांच्या आवारातील स्वच्छतागृहात साप निघाल्याचे राजपूत यांनी निदर्शनास आणून दिले. परिसरात बिबटेही येतात, असे त्या म्हणाल्या. तेव्हा ग्रामपंचायतींनी तातडीने आपल्या निधीतून दुरुस्ती करण्याचे निदेर्श सीईओ यांनी दिले. कन्नड तालुक्यातील अंबा उपळा येथे शिक्षकांचे समायोजन कधी करणार, असा प्रश्न शिवसेना सदस्य मनोज गायके यांनी उपस्थित केला.
शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी शिक्षकांची पदे रिक्त जागा यांबाबत माहिती दिली आणि ८ दिवसांत समायोजन करण्यात येईल, असे सांगितले. जि.प. प्रशालेला वर्ग-२ चा मुख्याध्यापक नसल्यामुळे नियोजन बिघडत चाललेले आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले. सावखेडा, गंगा येथे
शिक्षक नसल्याचे पंकज ठोंबरे म्हणाले, शिक्षका नसल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी नागरिक लोकवर्गणी करून मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खाजगी शिक्षकांच नेमणूक करीत असल्याचे शिवसेनेचे सदस्ट संजय निकम म्हणाले. तसेच शाळाबाह कामासाठी शिक्षक घेऊ नका, अशी मागणीह निकम यांनी केली.
जिपच्या प्रशासकीय इमारतीच्या मंजुरीपासून सर्व प्रकारचा निधी उपलब्ध करून देणार्या शिवसेना उबाठा गटनेत्याला व सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र दालन का दिले जात नाही. एका पक्षाला एक न्याय आणि दुसर्याला सापत्न वागणूक का? असा सवाल शिवसेनेचे जि.प. सदस्य मनोज गायके यांनी उपस्थित केला. आतापर्यंत याबाबत मागणी केलेली असतानाही जाणूनबुजून दालन दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. अध्यक्ष अविनाश गलांडे व बांधकाम सभापती सचिन गरड यानी स्वतंत्र दालनाची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले.






