• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Damage To Crops In Amble Area Due To Heavy Rain Impact On Products Nrab

अतिवृष्टीमुळे आंबळे परिसरात पिकांचे नुकसान ; उत्पादनांवर होणार परिणाम 

खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

  • By Aparna
Updated On: Oct 14, 2022 | 04:28 PM
अतिवृष्टीमुळे आंबळे परिसरात पिकांचे नुकसान ; उत्पादनांवर होणार परिणाम 
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माळशिरस : मागील तीन – चार दिवसांपासून परतीच्या मुसळधार पावसाने आंबळे (ता.पुरंदर) परिसराला झोडपले आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतातील पाणी निघत नसल्याने पिके कुजू लागली आहेत. बाजरी, मूग, तूर, सोयाबीन, घेवडा, भुईमूग, सूर्यफूल, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप पिकांवर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम होत आहे. पावसामुळे शेतीतील पिके काढणीची कामे खोळंबली आहेत. पिके आणि तण एकसारखीच वाढली आहेत. पाऊस उघडीप देत नसल्याने तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, घेवडा, चवळी ही कडधान्ये पिके जागेवर कुजत आहेत.

इतर पिकांची वाढही उन्हाअभावी खुंटली आहे. कीड व रोगराईलाही निमंत्रण मिळत आहे. शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या खरिपातील सर्वच पिके वाया जाण्याची भीती असल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात याच शेतकर्‍यांनी सर्वांना तारले. आता याच बळीराजावर अतिपावसामुळे उपासमारीची वेळ येते की काय असा? प्रश्न उभा राहिला आहे. अनेक महिला- पुरूष दुसर्‍यांच्या शेतात शेतमजुरी करून घरखर्च भागवत असतात. मात्र, त्यांची मजुरीही मंदावली आहे. दिवाळीचा सण गोड जाणार की दिवाळे काढणार, हीच चिंता सर्वांना आहे.

फवारणीचा खर्चही वाया
पिकांवरील वाढत्या कीड-रोगांमुळे पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नाही. औषधे फवारली तरी पावसामुळे ते वाया जात आहे. रोग आटोक्यात येत नसल्याने पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. भाजीपाला, फळ पिकांचे मोठे नुकसान होत असून, केलेला खर्चही निघणार नसल्याने जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. चारा पिकेही वाया गेली असून भविष्यातील चाराटंचाईनेही बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.

 रब्बी पेरण्यांनाही होतोय उशीर
यंदा मुबलक पाऊस आणि शाश्वत पाण्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटला तरीही किमान जिरायती भागात रब्बी पेरण्यांची लगबग सुरू झालेली नाही. जमिनीला वाफसाच नसल्याने, शेतकऱ्यांनी पेरण्यांचे धाडस केले नाही. पावसाने उघडीप दिल्यावर आठवडाभरात जिरायती भागातील रब्बी पेरणीस सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Damage to crops in amble area due to heavy rain impact on products nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 04:28 PM

Topics:  

  • Malshiras
  • Pune
  • Purandar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.