• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Farmers Are Expressing Their Desire For Loan Waiver Due To Crop Damage

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2025 | 12:22 PM
आपत्तीग्रस्तांना ३,२५८ कोटींचा निधी मंजूर

आपत्तीग्रस्तांना ३,२५८ कोटींचा निधी मंजूर (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर/दीपक घाटगे : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. एकीकडे कोरोना महामारीचा तडाखा, तर दुसरीकडे अतिवृष्टी, महापूर आणि अस्थिर हवामानामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेकांचे पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. गेल्या वर्षभरातही सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. परिणामी, आता त्यांना कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

साखर कारखानदार, आमदार, खासदार आणि मंत्री यांनीही या प्रश्नावर ठामपणे आवाज उठविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे हितसंबंध केवळ आंदोलनांतून नव्हे, तर विधानभवनापर्यंत पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गेल्या दोन वर्षांतील अतिवृष्टीमुळे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त उत्पादन घटले आहे. शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने कर्जफेड करणे कठीण झाले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफी झाली होती, मात्र ती अनेक प्रकरणांत धनदांडग्यांना आणि कर्जबुडव्यांना मिळाल्याचा आरोप झाला. त्यानंतर प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीसुद्धा आजही हजारो शेतकरी कर्जबाजारी आहेत.

शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज

सध्या शेतकरी ‘अस्मानी व सुलतानी संकटात’ सापडला आहे. वाढत्या व्याजदरामुळे कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांचा आत्मसन्मान टिकावा आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

आश्वासन कधी पूर्ण करणार?

यापूर्वी युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली होती. महाविकास आघाडी सरकारनेही कोणत्याही अटीशिवाय सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र सध्याच्या महायुती सरकारकडून निवडणुकीदरम्यान दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. सत्तेवर आल्यानंतर हे आश्वासन धुळीस मिळाले असून, कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

फेडण्याची ताकद उरली नाही

शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय आता सरकारकडे आशेने पाहत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे की, आम्ही कर्जमाफी मागतो कारण आमच्याकडे फेडण्याची ताकद उरलेली नाही. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असल्याची वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायी आणि लाजीरवाणी आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकटातून मुक्तता करावी, अशी मागणी शेतकरी संघटना, तज्ज्ञ आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Farmers are expressing their desire for loan waiver due to crop damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Farmers

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
1

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती
2

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

गावाचा गॅझेटमध्ये जन्म, ग्रामस्थ मात्र अंधारात! मणेराजूरीत वादळी ग्रामसभा
3

गावाचा गॅझेटमध्ये जन्म, ग्रामस्थ मात्र अंधारात! मणेराजूरीत वादळी ग्रामसभा

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास

बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 23, 2025 | 10:50 AM
मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth

मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth

Nov 23, 2025 | 10:49 AM
Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

Nov 23, 2025 | 10:44 AM
मस्ती आली अंगाशी…! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

मस्ती आली अंगाशी…! प्रँक करताच मुलाला राग झाला अनावर, लिफ्टमध्येच तोंड सुजेपर्यंयत चोपलं; Video Viral

Nov 23, 2025 | 10:43 AM
BJP National President: वय, कामगिरी आणि रणनीती; धर्मेंद्र प्रधान होणार भाजपचे पुढचे अध्यक्ष?

BJP National President: वय, कामगिरी आणि रणनीती; धर्मेंद्र प्रधान होणार भाजपचे पुढचे अध्यक्ष?

Nov 23, 2025 | 10:30 AM
युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…

युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…

Nov 23, 2025 | 10:26 AM
हिवाळ्यात शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने घरी बनवा भोपळ्याचे सूप, नोट करा रेसिपी

हिवाळ्यात शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने घरी बनवा भोपळ्याचे सूप, नोट करा रेसिपी

Nov 23, 2025 | 10:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.