ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी अंदाजे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘आंदोलन अंकुश’वर विश्वास असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडून या उपक्रमासाठी भरभरून मदत केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही प्रयोगशाळा विनाशुल्क असणार आहे. आंदोलन अंकुशच्या माध्यमातून सातत्याने उसाला योग्य भाव मिळण्यासाठी लढा दिला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळवून देताना त्यांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी ऊसाची कायदेशीर किंमत ही साखर कारखान्याच्या रिकव्हरीवर ठरवले जाते.
लोकवर्गणीतून ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प
आजच्या दराने एक रिकवरीचे 350 रुपये होतात, मग तालुक्यातील गाळप होणाऱ्या उसाचे प्रमाण लक्षात घेतले तर यातून शेतक-यांचे कोटववधी रुपयांचे नुकसान होते, हे मान्य करावे लागेल, या प्रकाराला आळा घालण्यासाठीच लोकवर्गणीतून ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प केला असून यासाठी लोकवर्गणी जमवण्यासाठी आठवड्याभरात तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेऊन मदतीचे आवाहन केले जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.
12.50 टक्के रिकव्हरी दिसायला हवी
आज जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्याची त्या-त्या दिवसाची रिकव्हरी पाहिली तर ती 11.40टक्केच्या आसपास दिसते. तसेच ब्रिक्स मीटरने जर आज पुरवठा होणाऱ्या उसाची ढोबळ अर्थाने रिकव्हर काढली तर ती 12.50 टक्क्यांच्या पुढे दाखवते. व्हरायटीनुसार रिकव्हर काढायची झाल्यास10001किंवा 86032या दोन्ही व्हरायटीच्या ब्रिक्स या बुडक्यामधला भाग आणि पकडली असेल तर 25 ब्रिक्स निघतात. वाड्याकडील भाग याची सरासरी काढून दोन ब्रिक्स म्हणजे एक टक्का रिकव्हरी असे स्टैंडर्ड प्रमाण धरले जाते. त्यानुसार 12.50 टक्के आजची कारखान्याची रिकवरी दिसायला हवी. सर्वच कारखाने प्रामुख्याने याच व्हरायटीचा ऊस जास्त घेतात.






