Heavy Rain Devastates Soybean Crop in Latur
लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण पीक जमिनीतच कुजून गेली आहे. या अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच कल्पना येईल कि त्या शेतकऱ्याची सगळी मेहनत पाण्याखाली वाहून गेली. त्याचा त्रागा त्याला होणार त्रास खूप सांगून जाते.
गेल्या काही दिवसांपासून लातूर आणि आसपासच्या भागात सलग पावसाची मालिका सुरू आहे. सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असतानाच या पावसाने शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात बुडाली असून, काही ठिकाणी ओलसरपणामुळे दाण्यांवर बुरशी आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता उत्पादन विक्रीत मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
अपनी फसल बर्बाद होने पर एक किसान का दर्द महसूस कीजिए…
महाराष्ट्र के लातूर में बारिश से सोयाबीन की फसल को भारी नुकसान हुआ है… pic.twitter.com/UYWEdrVusL — Saurabh (@sauravyadav1133) October 29, 2025
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची शेती केली होती. आता फसल हातातून गेल्याने त्यांच्या समोर कर्जफेडीचे मोठे संकट उभे राहिले आहे. सरकारने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.
लातूर जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे काही तालुक्यांमध्ये 60 ते 70 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे सर्वेक्षण सुरू असून लवकरच अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाईल.”
शेतकऱ्यांचा जीव की प्राण असलेली शेती आता हवामानाच्या दयेवर आहे. एकीकडे उन्हाळ्यातील दुष्काळ आणि दुसरीकडे हंगामात झालेला अवकाळी पाऊस या दोन्हीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारकडून योग्य मदत न मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना आत्मनिर्भर राहणे कठीण होईल, अशी भावना ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे.






