Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा (फोटो-सोशल मीडिया)
Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: मुंबईसह राज्यात बांगलादेशी नागरिकांना घर भाड्याने दिल्यास कडक कारवाई होणार आहे. अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आसरा दिल्यास सरकार, पोलिस संबंधित विकासक, व्यापारी तसेच उद्योगपतींवर कडक कारवाई करणार असून, कारावासाचीही शिक्षा भोगावी लागणार आहे.
अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना नोकरी, राहण्यासाठी जागा देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. गृहमंत्रालयाने यासंबंधी परिपत्रक जारी केले असून, सर्व प्रशासकीय विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक सत्य समोर आले असून, काही मोजके व्यावसायिक आपल्या फायद्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात आणत आहे.
India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप
घुसखोर भारतात राहण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत आहेत. खऱ्या कागदपत्रांशी छेडछाड करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात आहे. यावर उपाय म्हणून, सर्व प्रशासकीय विभागाना अजोशी जोडलेले पुरावे आणि कागदपत्रे पडताळण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कागदपत्रे जारी करणा-या प्रणालीद्वारे कागदपत्रांची सत्यता त्वरित पडताळणे शक्य होईल. या निर्णयामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्याऱ्यांवर प्रशासनाची देखरेख आणखी वाढेल आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांवरही अंकुश लावता येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की. कोणतीही व्यावसायिक कपनी बांगलादेशी नागरिकांना कामगार म्हणून कामावर ठेवू शकगणहर नाही. जर बांधकाम कामगार, मेकॅनिक आणि वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर आणि वेटर या क्षेत्रात बांगलादेशी कामगार आदळले तर मालकांना बेट जवाबदार धरले जाईल, आवश्यक असल्यास कायदे आणि नियमांमध्ये बदल केले जातील असेही परिपत्रकात म्हटले आहे. ‘राष्ट्रीय सुरक्षा सर्वोपरी आहे असे सांगून, कोणत्याही परिस्थितीत घुसखोरांना कामावर ठेवू नये असा आदेश जारी करण्यात आला आहे.
Google Layoffs Update: गुगलकडून ‘Exit Package’ योजना जाहीर! कर्मचाऱ्यांमध्ये वाढली अस्वस्थता
मुंबईतील विकासक आणि कंत्राटदारांना ते बांगलादेशी कामगारांना कामावर ठेवत नाहीत, असे प्रतिज्ञापत्र देण्यास सांगण्यात आले आहे, हे राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले, ग्रामीण भागात संशयास्पद नागरिक आढळल्यास त्यांची चौकशी करावी, असेही या परिपत्रकात निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यांना माहिती वावी, गृह विभागाने जिल्हा दंडाधिका-यांना यारी की लियाना सविस्तर सूचना करण्याचे आदेशही दिले आहेत.






