Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा (फोटो-सोशल मिडिया)
Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे ‘कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प’ उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर घरगुती व औद्योगिक कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे हे नवी मुंबई महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान ठरत होते.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईसाठी स्वतंत्र आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प असावा, असा ध्यास घेत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. या अनुषंगाने त्यांनी २५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र सादर करून तुर्भे येथे ‘कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प’ उभारण्याची ठोस मागणी केली होती.
Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात
या पत्रामध्ये नवी मुंबईतील वाढत्या कच-याच्या समस्येचा सविस्तर आढावा देत पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजना म्हणून या प्रकल्पाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना या संदर्भात आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डॉ. रवींद्र यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना प्रकल्पासंबंधी सविस्तर प्रस्ताव, स्वयंस्पष्ट अभिप्राय आणि आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश दिले.
या संपूर्ण प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा करत अखेर ५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी, घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ अंतर्गत एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्यासाठी मेरारों आर अॅड बी ग्रीनटेक एलएलपी या संस्थेला लेटर ऑफ अवॉर्ड (एलओए) देण्यात आले.
Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?
या प्रकल्पासंबंधीची संक्षिप्त टिप्पणी, प्रशासकीय मंजुरी आदेश आणि एलओए देण्यात आल्याची अधिकृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना सादर केली. लवकरच नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्य शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी व त्यातून वीज निर्मितीसाठी हा एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक-खाजगी लोकसहभागातून सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १८०० ते २००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प नवी मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






