"मेट्रोला मराठीचा द्वेष? फलक मराठी करावा अन्यथा….", आता मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातचील तमाम मनसैनिकांना एक पत्र लिहिले असून या पत्राद्वारे राज ठाकर यांनी मनसैनिकांना नवा आदेश दिला आहे. यामध्ये मराठीचे आग्रह धरलात ते उत्तम झालं. सर्वदूर असलेली संघाटनात्मक ताकद पण दिसली, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बँकांसह काही अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. त्यासाठी निवेदन देऊन अल्टिमेटम द्या,असा आदेश मनसैनिकांन दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी बँकेत धाड टाकत बँक मॅनेजरला निवेदन दिल्याचे पाहायला मिळाले होते. तर या निवेदनानंतर कित्येक ठीकाणी बँकांमधील हिंदी आणि इंग्रजीचे बोर्ड काढून मराठीत करण्यात आहे. याचदरम्यान आता मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 2 अ टप्पा लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरु होण्याआगोदरचं मुंबईतील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर आली आहेत.
सध्या मुंबईत मेट्रो0नेटवर्कचा विस्तार सुरू आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो ३ मार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. मुंबई मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सुरू होण्याआगोदरचं मुंबई मेट्रो स्टेशन मनसेच्या रडारवर आले आहे.त्यामागे कारण आहे. नुकतेच नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांचा कारभार मराठी भाषेतून व्हावा, यासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित केलं. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आंदोलन थांबवण्याची सूचना केली.
मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळ्यात राज ठाकरे म्हणाले होते की, मनसैनिकांना बँकेचा कारभार मराठीत सुरू आहे की, नाही? ते पाहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिक बँकांमध्ये धडकण्यास सुरुवात झाली..
मेट्रो 3 च्या टप्प्यातील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर येण्यामागे मराठी भाषेचा मुद्दा आहे. मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनबाहेर असलेला फलकवार इंग्रजीत नाव लिहल्याने मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. “मेट्रोला मराठीचा द्वेष? मराठी बोर्ड ताबडतोब लावा, अन्यथा गाठ मनसेशी” अशा इशारा मनसेने दिला आहे. यासंदर्भात मेट्रो प्रशासनाला पत्र पाठवले आहे. दोन दिवसात त्यांनी नाव बदललं नाही, तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मराठीचा विषय सुरु असताना, मेट्रोला कसला माज दोन दिवसात मराठीत नाव केल नाही तर उत्तर देऊ असं मनसेनं म्हटलं आहे.