नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष तथा प्रवक्ते गजानन श्रीकृष्ण काळे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मयूर भुजबळ यांना निवेदन सादर केले. निवेदनात या घटनेला संबंधित यंत्रणेच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण म्हटले असून, सार्वजनिक ठिकाणी पथदिव्यांच्या विद्युत यंत्रणेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात झालेल्या हलगर्जीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर
महावितरणने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार संबंधित पथदिवा, वीजजोडणी आणि आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची फौजदारी चौकशी करून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरील सदोष केबल, मीटर बॉक्स, विद्युत सुरक्षा उपकरणे, सीसीटीव्ही फुटेज, देखभाल नोंदी, सुरक्षा तपासणी अहवाल आणि कंत्राटाशी संबंधित कागदपत्रे तातडीने जप्त करून वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्याचीही मागणी मनसेने केली आहे.
दरम्यान, विजेचा धक्का लागलेल्या दोन्ही विद्यार्थिनींवर वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनातून दिला आहे.
नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्याच रस्त्यावर एल.पी. ब्रिज खाली जवळील बिकानेर स्वीट्समोर इलेक्ट्रिक वायर तुटून शॉर्टसर्किट झालं. त्याचा झटका दोन स्कूटरवरून जाणाऱ्या विद्यार्थिनींना लागला.
Mumbai-Nashik Highway Traffic Jam: पावसाचा हाहाकार! मुंबई-नाशिक …






