Rahul Kul on Ring Road: पुण्याच्या वाहतूक कोंडीवरुन राहुल कुल आक्रकम: राज्य सरकारचे मोठे पाऊल
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आ. कुल यांनी पुणे महानगर क्षेत्रातील दळणवळण सुलभ करण्यासाठी रिंगरोड आणि उड्डाणपुलांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. हे प्रकल्प पुण्याच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या ‘इनर रिंग रोड’चे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खडकवासला ते लोणी काळभोर या २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याकरिता शासनाने सुमारे २२०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यभागी सुमारे ३४ किलोमीटरची शासकीय जागा उपलब्ध होणार असून भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी तिचा वापर करावा, असेही त्यांनी सुचविले.
Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या
पुणे शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिकेने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमणे कालबद्ध पद्धतीने हटवावीत, अशी मागणी आ. कुल यांनी केली.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिंगरोड प्रकल्पातील १२ पॅकेजेसपैकी ९ पॅकेजेसचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या १४.१ हेक्टर जागेसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.






