Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा
याच वेळी बांगलादेशात BNP चे अध्यक्ष तारिक रहमान यांवी निवडणूक निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागमी केली आहे. तर दुसरीकडे जमात-ए-इस्लामीने निवडणुकीत गोंधळाचा आरोप करत कुमिल्ला-८, शरीयतपूर-२ आणि पटुआखली-१ मतदारसंघात मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. बांगलादेश निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ४७.९१% मतदान झाले आहे. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, अजूनही काही मतदान केंद्रांवर मतदार रांगेत उभे आहेत.
निवडणुकांसाठी मतदान सुरु असताना मात्र अनेक ठिकाणी संघर्ष झाला आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP)आणि जमात-ए-इस्लामीमध्ये खुलाना येथील मतदान केंद्रांवर चकामक झाली होती. BNP ने जमातवर मतांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चकामक झाली होती. ज्यामध्ये BNPचे नेते मोहबुझ्झमान कोची यांची मृत्यू झाला होता. याच वेळी दुसरकीडे बांगलादेशच्या मुन्शींगज-३ आणि गोपालगंज सदर भागातही मतदान केंद्रांबाहेर बॉम्ब स्फोट करण्यात आले होते. यामध्ये एक सुरक्षा अधिकारी आणि एक १४ वर्षांची चिमुलकी गंभीर जखमी झाली होती.
भारतासाठी निकाल का महत्वाचा?
सध्या बांगलादेशच्या निवणुक निकालांकडे भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेशच्या निकालावर भारताची दक्षिण आशियाईतील पुढील धोरणे ठरणार आहे. देशात कट्टरपंथीयांची सत्ता आल्यास भारतासाठी सीमेवर मोठी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. जमात-ए-इस्लामीचा विजय भारतासाठी धोक्याचा ठरु शकतो.
जमातचा पाकिस्तानकडे झुकाव आणि इस्लामिक विचारसणीमुळे भारताचा बांगलादेशातील प्रभाव कीम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताच्या अनुकूल पक्ष सत्तेत आल्यास भारताला बांगलादेशसोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच तारिक रहमान सत्तेत आल्यास सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Ans: बांगलादेश निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ४७.९१% मतदान झाले आहे.
Ans: बांगलादेशात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर BNP चे नेते तारिक रहमान यांनी निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे.






