मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- यूट्यूब)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा
शिवतीर्थवर पार पडली महायुतीची प्रचार सभा
मराठी माणसाचे हित जपण्यासाठी आम्ही समर्थ -एकनाथ शिंदे
Mumbai Maharashtra Politics: आज मुंबईमधील शिवाजी पार्क येथे महायुतीची प्रचार सभा पार पडली. 15 तारखेला मुंबई आणि राज्यातील अन्य महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. आजच्या सभेत महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कमधील सभेत बोलताना म्हणाले, “पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहे. आज स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे. त्यांना नमन करतो. मी कोणाकडून तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा लाव रे तो व्हिडिओ. या ठिकाणी काल जि सभा झाली त्यामध्ये तेच मुद्दे, तीच कारणे. ही मुंबई कोणाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तूटू शकत नाही.”
“आज तुम्हाला मराठी माणसावर संकट आले आहे असे वाटत आहे तर गेले 30 वर्षे तुम्ही नक्की काय केले? मला आव्हान देतात की आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे तुम्हाला मुलाला प्रमोट करायचे आहे. अरे बाबा जर आदित्यशीच चर्चा करायची असेल तर आमची उमेदवार शीतल गंभीर देखील पुरेशी आहे. आज मी खुले आव्हान देतो की, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरे येउदेत , आमच्या शीतल गंभीर येतील. मग करूया चर्चा,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही तर तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. काही लोकांनी माझी नक्कल केली. नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली हे त्यांना समजायला हवे. ते म्हणाले हिन्दी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा सांगतो,या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीचीच,”असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.






