• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Concerns Of Central Government Rising Sea Levels Are Becoming A Threat To Cities

केंद्र सरकारची चिंता; समुद्राची वाढती पाणी पातळी शहरांसाठी ठरतेय धोकादायक

समुद्राची वाढती पातळी आणि त्याचा किनारी भूजल पातळीवरील परिणाम आणि किनारी धूप यावर केंद्र सरकार धोरणात्मक चौकटीवर काम करत आहे. पर्यावरण वॉचडॉग नॅटकनेक्ट फाउंडेशनने पीएमओ वेबसाइटद्वारे तक्रार दाखल केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2025 | 07:38 AM
sea level (फोटो सौजन्य- pinterest)

sea level (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

समुद्राची वाढती पातळी आणि त्याचा किनारी भूजल पातळीवरील परिणाम आणि किनारी धूप यावर केंद्र सरकार धोरणात्मक चौकटीवर काम करत आहे. पर्यावरण वॉचडॉग नॅटकनेक्ट फाउंडेशनने पीएमओ वेबसाइटद्वारे तक्रार दाखल केली आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे भूजल पातळी वाढू शकते. पूर येऊ शकतो या संशोधन अहवालांवर चिंता व्यक्त केली. नवी मुंबईतील पर्यावरण संस्था असलेल्या नेटकनेक्ट संस्थेचे संचालक बी.एन. कुमार यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास न्यूझीलंडमधील नवीन संशोधन निष्कर्ष धोक्याची सूचना देत आहेत. नवी मुंबई शहरात देखील किनाऱ्याची झीज कमी करणाऱ्या, रोखणाऱ्या कांदलवनांची कत्तल करून सर्रास विकास केला जात आहे.

पूर येण्याचे धोके वाढू शकतात

न्यूझीलंडमधील डुनेडिन या किनारी शहरावर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका नवीन पेपरमध्ये असे म्हटले आहे की समुद्राच्या पातळीत वाढ भूजल पातळीत बदल करू शकते आणि त्यामुळे अंतर्गत पूर येण्याचे धोके वाढू शकतात. हे मंत्रालय समुद्राची वाढती पातळी, किनारी धूप आणि किनारी भूजल पातळीत घट होत असल्याबद्दल अर्जदाराने उपस्थित केलेल्या धोक्याविषयी मंत्रालयाच्या धोरण चौकटीच्या विकासादरम्यान हे मुद्दे विचारात घेतले जातील, असे परिणाम मूल्यांकन (संचालक अरविंद कुमार अग्रवाल यांनी स्वाक्षरी केलेल्या उत्तरात म्हटले आहे.

आणखी आव्हानात्मक बदल घडण्याचे संकेत

है संशोधन निष्कर्ष अलिकडेच एजीयूने प्रकाशित केलेल्या विज्ञान मासिकाने प्रकाशित केले आहेत, जे पृथ्वी आणि अवकाश विज्ञानातील अर्धा दशलक्षाहून अधिक समर्थकांना आणि व्यावसायिकांना पाठिंबा देणारे जागतिक समुदाय आहे. दक्षिण डुनेडिनमध्ये आधीच अधूनमधून पूर येत आहेत जे समुद्र पातळी वाढल्याने आणखी आव्हानात्मक बनतील. संशोधकांनी हे शहर हवामान बदल आणि वाढत्या समुद्रांना प्रतिसाद देणाऱ्या आणि जुळवून घेणाऱ्या न्यूझीलंड समुदायांसाठी एक पोस्टर चाइल्ड म्हणून वर्णन केले आहे.

जलसाठे बुजविण्याऐवजी पाण्याच्या विस्ताराची गरज

म्हणूनच पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बहाण्याने जलसाठे बुजविण्याऐवजी पाण्याचा विस्तार होण्यासाठी जागा राखण्याची तातडीने गरज आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पर्यावरणविरोधी धोरणे आणि पर्यावरणीय आपत्तींना हलक्यात घेण्याऐवजी, समुद्राची पातळी वाढणे आणि भूगर्भातील पूर या दुहेरी धोक्यांसाठी सरकारने स्वतःला तयार करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने भारताच्या भूगर्भीय सर्वेक्षणासह समुद्राच्या वाढत्या पातळीचा अभ्यास करताना किनारी भूजल तक्त्यांचे परीक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले. किनारपट्टीवरील धूपबाबत सरकारच्या एका संक्षिप्त अहवालाव्यतिरिक्त, देशात ७ हजार ५०० किमी पेक्षा जास्त लांबीची समुद्रकिनारी असली तरी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर कोणतीही गंभीर चर्चा झालेली नाही, असा युक्तिवाद नॅटकनेक्टने केला.

रायगड जिल्ह्यातील भातशेतीला बसणार फटका

शिवाय, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुक्यांसारख्या भागात, आंतरभरतीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे भातशेती पाण्याखाली जाऊ लागली आहे आणि सखल पातळीच्या भागात पूर येऊ लागला आहे, असे सागर शक्तीचे संचालक नंदकुमार पवार यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही, अधिकारी वाढत्या समुद्राच्या पातळीसह वाढत्या संकटाकडे डोळेझाक करत आहेत, असे त्यांनी खेद व्यक्त केला.

मुंबईचा १० टक्के भाग बुडणार आणखी एका अभ्यासातून असे दिसून  आले आहे की २०४० पर्यंत, वाढत्या समुद्रांच्या पाण्यामुळे मुंबई, यानम आणि थुथुकुडीचा १० टक्केपेक्षा जास्त भाग बुडून जाईल. पणजी आणि चेन्नईच्या ५%-१०%; आणि कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरी येथील १%-५%, २१०० मध्ये, मंगळुरू (टियर-२ शहर), हल्दिया, पारादीप, थुधुकुडी आणि यानम (शहरे) येथे पूरस्थिती जास्त असेल, असे बेंगळुरूस्थित सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीच्या अभ्यासात नॅटकनेक्टने निदर्शनास आणून दिले आहे.

Web Title: Concerns of central government rising sea levels are becoming a threat to cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 07:38 AM

Topics:  

  • Arabian Sea
  • Central government
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
3

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
4

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिवाळ्यात का  वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Nov 19, 2025 | 05:30 AM
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.