अटल सेतूवर आत्महत्येचं सत्र सुरूच; पुलावर मोटरगाडी गाडी थांबवली अन्… (फोटो सौजन्य-X)
मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून आत्महत्या करण्याचे सत्र सुरुच आहे. अटल सेतूवर एका व्यक्तीने मोटरगाडी थांबून उडी मारल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबवली आहे. त्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
सोमवारी सकाळी (30 सप्टेंबर) दक्षिण प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्षाला दूरध्वनी प्राप्त होता. त्यात एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे पोलिसांना समजले. शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अटल सेतूवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सावर्डेकर, ठाणे अमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक साकोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळी उडी मारणाऱ्या इसमाची लाल रंगाची मोटारगाडी (ब्रेझा) क्र. MH01DT9188 उभी होती. ती मोटर सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शिवडी पोलिसांना सुमारे 8.5 किमी अंतरावर असलेल्या अटल सेतू पुलावरून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज (30 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास घडली.
अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासली घटना घडली ९ वाजून 57 मिनिटांनी घडल्याचे दिसते. घटनास्थळी बचाव पक्षक दाखल झाले असून त्या व्यक्तीचा स्पीड बोट पार्क साहाय्याने शोध सुरू आहे. संबंधीत व्यक्तीच्या कुटुंबियांची माहिती त्यांना कळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात अटल सेतूवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेतूवर वाहने थांबविण्यास बंदी असताना प्रवासी कोणत्या कारणामुळे वाहने थांबवताना दिसतात. काही दिवसांपूर्वीत एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही महिला अटल सेतूवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र टॅक्सी चालक आणि पोलिसांच्या तप्तरतेमुळे 56 वर्षीय महिलेचे प्राण वाचले होते. मात्र त्या सेतूवरून एका व्यक्तीने आणि महिलेने उडी मारून आत्महत्या केली आहे. अटल सेतूवरून 43 वर्षीय महिलेने उडी मारली होती. यानंतर 24 जुलै एका व्यक्तीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. तो स्वत: गाडी चालवून अटल सेतूवर आला आणि त्याने गाडी मध्यभागी उभी करून समुद्रात उडी मारली होती. यानंतर अटल सेतूवर गस्त वाढवण्यात आली होती.