कॅन्सरग्रस्तांना मिळणार नवसंजीवनी! नितीन तिवाटणे यांच्या हॉस्पिटल संकल्पासाठी सरसावले हात
यावेळी डॉ. मुकुल घरोटे यांनी बोलताना सांगितले की कर्करोगाला कोणीही घाबरु नये, मात्र त्याकडे कोणी दुर्लक्ष ही करु नये, तो पुर्णपणे बरा होतो मात्र तो बळावला तर रुग्ण दगावु पण शकतो यासाठी प्रत्येकाने सकस आहार व नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. मी आजवर हजारो रुग्ण पाहिले आहेत त्यांना आजाराचे निदान उशीरा झाले आहे, मात्र म्हसवड शहरात नितीन तिवाटणे यांनी स्वत: च्या आईचा या दुर्धर आजाराने बळी घेतल्याने यापुढे असा बळी कोणाचा जावु नये यासाठी सुरु केलेला लढा खरोखरच कौतुकास्पद आहे, त्यांनी अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन केल्याने अनेकांना येथे मोफत तपासणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तपासणी साठी येथे कोणतीही फी आकारली जाणार तर नाहीच या शिवाय प्रत्येकाचा तपासणी रिपोर्ट हा गोपनीय राहणार आहे.
तिवाटणे यांनी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे सुरु केलेले कँन्सर हॉस्पिटल उभारणीचे काम हे खुपच महान काम आहे.त्याठिकाणी कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी नवसंजिवनी दिली जाणार आहे, अद्यावत मशीन व तज्ञ डॉक्टरांची टिम तेथे तैनात केली जाणार आहे. याशिवाय गोशाळा उभारणीचे काम तेथे होणार आहे, तिवाटणे हे पेशाने इंजिनियर आहेत पण त्यांचा संकल्प हा अतिशय स्तुत्य आहे, कोणी डॉक्टरसुध्दा असा संकल्प करणार नाही तो त्यांनी केला आहे, त्यांच्या सारख्या व्यक्तीमुळेच आज कँन्सरग्रस्त रुग्णांना जगण्याची एक नवी उमेद मिळत आहे. त्यांनी हाती घेतलेले काम हे सर्वसामान्यांसाठी असल्याने सामान्य नागरिकांनीही पुढे येवुन त्यात आपले योगदान द्यावे, शेवटी लोकांचा सहभाग हा खुप महत्वाचा आहे, लोकवर्गणीतुन हे स्वप्न साकारलं जातयं यासाठी लोकांनीही पुढे यावे असे आवाहन शेवटी डॉ. घरोटे यांनी केले.
यावेळी इंजिनियर नितीन तिवाटणे म्हणाले की मी माझ्या आई ला या आजाराने तेव्हा तीला काय त्रास झाला हे अगदी जवळुन पाहिले आहे, त्यामुळे भविष्यात असा त्रास कोणालाही होवु नये यासाठी येथेच एक कँन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला, त्यासाठी मी अनेक ठिकाणी जागा शोधली पण मला हवी तशी ती मिळाली नाही, जेव्हा माझे मित्र नितीन शेडे – पाटील यांना हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वमालकीची एक एकर जागा यासाठी मोफत देवु केली, त्यामुळे खटाव तालुक्यातील सातेवाडी परिसरात हे रुग्णालय सुरु करण्याचा घाट घातला आहे, आता कामाला लवकरच सुरुवात होत असुन तेथील माळरानावर अशा रुग्णांना नवसंजिवनी देण्याचे मोठं काम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी डॉ. विकास बाबर, डॉ. कुलकर्णी, डॉ. शहा, नितीन चिंचकर, डॉ.शितल तिवाटणे, सविता तिवाटणे, सचिन विरकर या सह बहुतांशी नागरिक उपस्थित होते. यावेळी १३० रुग्णांची आरोग्य तपासणी येथे करण्यात आली.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा ‘डंका’! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ






