जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची मावळच्या विकासकामांबाबत मागणी आहे (फोटो - सोशल मीडिया)
वडगाव मावळ : सतिश गाडे : पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील कौंसिल हॉल येथे आज जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. (Maval News) उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. (Pune News)
या वेळी आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच नागरिकांच्या हिताच्या योजनांना गती देण्याची ठाम मागणी केली. ग्रामीण व शहरी भागासह कॅंटोन्मेंट बोर्डाचा समावेश असलेल्या मावळ तालुक्याच्या विशेष परिस्थितीचा विचार करून या भागासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठोस मागणी मांडली केली आहे.
हे देखील वाचा : डॉलर्सच्या अतिरिक्त आयातीबद्दल सरकार अस्पष्ट; Trade Deal खरंच फायद्याची की तोट्याची?
तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारी सर्व विकासकामे व साहित्य पुरवठा दर्जेदार असावी, यासाठी ठेकेदारांवर कडक नियंत्रण ठेवावे, अशीही भूमिका आमदार सुनील शेळके यांनी मांडली. निकृष्ट कामे आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर देखरेख ठेवावी, यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीत मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे मावळ तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा गुलाल
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया देताना भावनिक शब्दांत आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस च्या या दणदणीत विजयामागे मावळच्या जनतेचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “अजितदादा असते तर आम्ही आज मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला असता. मात्र या कठीण परिस्थितीतही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम साथ दिली, याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे,” असे शेळके म्हणाले आहेत.
विकासकामांची आठवण काढत व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली. “अजित पवार यांनी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून अनेक महत्त्वाच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मावळमध्ये जे काही परिवर्तन होत आहे, त्यामागे अजितदादांचे मोठे योगदान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.






