Raigad News: नेरळ-खांडा पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह; मनसेकडून चौकशीची मागणी
ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
जून २०२५ मध्ये कल्याण-कर्जत रस्त्यावरील नेरळ गावातील खांडा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. ४० वर्षे जुना असलेल्या या लहान पुलाचे पिलर खचल्याने पोलिसांनी हा पूल वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल आठ महिने लावले आहे. मार्च २०२६ मध्ये या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन कोटी खर्चुन हा पूल बांधण्यात येत आहे. पूर्वीच्या लहान पुलाच्या लोखंडी सळ्या या मोठ्या जाडीच्या होत्या, असा दावा मनसेचे नेरळ शहर अध्यक्षांनी केला आहे. तर दुसरीकडे सध्या या पुलाचे पिलर बांधण्याचे काम सुरू असून खाली पाणी असताना काँक्रीटीकरण कसे चांगल्या दर्जाचे होणार? असा प्रश्न देखील केला आहे. मनसेकडून या पुलाच्या कामाबद्दल कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र पक्षाचे वतीने कोकण भवन येथील अधीक्षक अभियंत्यांना दिले जाणार आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकामा खात्याने दहा वर्षासाठी पी. पी. खारपाटील कंपनीला दिला आहे. त्यामुळे तो पूल देखील पी.पी. खारपाटील कंपनीने बनविणे आवश्यक होते. परंतु या पुलासाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल दोन कोटीचा निधी दिला जाणार आहे. यास नेरळ बचाव समितीचे कार्यकर्ते मानवाधिर कार्यकर्ते गोरख शेप यानी आक्षेप घेतला आहे. शासनाने जर रस्ता दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीला दिला आहे, तर त्या रस्त्यावरील पूल शासन का बांधते? या प्रश्नाचे उत्तर बांधकाम खात्याने दिले पाहिजे, असे गोरख शेप यांचे म्हणणे आहे.
दोन कोटी रुपये खर्चुन पूल बांधला जात असून या पुलाच्या पाया बनविला जात असताना तेथे पाणी असताना कॉक्रिट टाकण्यात आले आहे, तर लोखंडी सळया या देखील कमी जाडीच्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पुलाचे भवितव्य अधांतरी असू शकते, असा मनसेचा तक्रारी मधील सूर आहे.
नेरळ खांडा येथे बांधण्यात येत असलेल्या या पुलाच्या कामासाठी सध्या वापरले जात असलेले लोखंडी ही कमी जाडीचे आहेत. पूर्वीच्या लहान पुलाच्या लोखंडी सळ्या या मोठ्खा जाडीच्या होत्या. पिलरच्या खाली कॉक्रीटीकरण करताना तेथे पाणी होते. त्यामुळे अशा पद्धतीने काँक्रीटीकरण कसे चांगल्या दर्जाचे होणार ?- सुभाष नाईक, नेरळ शहर अध्यक्ष, मनसे






