'लक्ष्मी' कंपनी बंद होईपर्यंत लढा (फोटो- istockphoto)
‘लक्ष्मी’ कंपनी बंद होईपर्यंत लढा
चिपळुणात संघर्ष समितीचा निर्धार
आजच्या केले जाणार जोरदार आंदोलन
चिपळूण: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरुच ठेऊया असा निर्धार शहरातील सावकर सभागृहात झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच कंपनीविरोधात ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या गेटवर होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली असून शहरातील बहादूरशेखनाका (chiplun) येथून रॅलीला सुरुवात होणार आहे.
या बैठकीत गेल्या काही वर्षापासून कोकण विभागात रासायनिक उद्योगांमुळे गंभीर वायू व जलप्रदूषण झाले असून एमआयडीसी परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार, कर्करोग व इतर दुर्धर आजार होत आहेत. यात आता इटलीत प्रदूषणामुळे हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली व साडेतीन लाख लोकांना अनेक रोगांनी बाधित केलेली मिटेनी कंपनी सध्या लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल या नावाने लोटे परशुराम येथे कार्यरत झाली आहे. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे बाधित होणार असल्याने ही कंपनी तातडीने बंद झालीच पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली. या जीव घेणाऱ्या कंपनीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ८ रोजी पुकारलेले आंदोलन तितक्याचताकदीने करुन एवढ्यावरच न थांबता ही कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
निसर्गासाठी आंदोलन
विषारी कंपनी, त्वरीत हटवा, जीवसृष्टी वाचवा, हा राजकीय नाही, मानवतेचा लढा अशा घोषणा देण्यात आल्या, वाचेली मार्गदर्शन करताना माजी खासदार हुसेन दलवाई यांनी, या हे आदोलन आपले जीव व निसर्ग वाचवण्यासाठी आहे, त्यामुळे या आआंदोलनात आमदार भास्कर जावद, माजी आमदार, डॉ. विनय नातू पर्यावरणवादी उल्का महाजन, डॉ. मंगेश सावंत, सत्यजित सावंत त्यांच्या कार्यकत्यांसह उपस्थित राहणार आहे.
इटलीने हाकलले मग कोकणात एन्ट्री का? व्हायरल पोस्टमुळे उडाली नागरिकांची झोप; MPCB चे अधिकारी थेट…
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
असल्याने नागरीकांनीही मोठ्या संख्येने सहसभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी संघर्ष समितीचे अशोक जाधव, उदय घाग, सुमत्ती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदुलकर, मल्हार इंदुलकर, पत्रकार सतीश कदम, अॅड. संकेत साळवी, सुबोध सावंतदेसाई, तुळशीराम पवार, निलेश भोसले, इब्राहिम दलवाई, अजीम सुर्वे, गुलाब राजे, फैसल देसाई, अल्पेश मोरे, शहानवाज शाह, डॉ. मधुकर शिंगे, केशव लांबे, बशीर बेबल, संजय बुरटे, अंकुश काते, चंद्रकांत चाळके, हुसैन ठाकूर, राजेंद्र आंबरे, सजीव उसाळे, संदीप आंबरे आदी उपस्थित होते.






