रत्नागिरी जिल्हा परिषद (फोटो- सोशल मीडिया)
उद्या होणार जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी मतदान
काल संध्याकाळी संपली प्रचाराची मुदत
पंचायत समिती स्तरावरही निर्माण झाली चुरस
रत्नागिरी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर गुरुवारी जाहीर प्रचाराच अखेरचा दिवस संपताच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळील पूर्णविराम मिळाला. गेल्या पंधरवडाभर सुरू असलेल्या सभा, मेळावे, पदयात्रा कोपरा सभा आणि घरभेटींनी ढवळून निघालेले राजकीय वातावरण रात्री दह वाजता शांत झाले. प्रचाराच्या तोफ थंडावताच आता सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांच्या हाती सुपूर्द झालेले असून उद्या होणाऱ्या मतदानात्त मतदारांच कौल मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता मतदानाच्य टक्केवारीकडे आणि निकालाच्या दिशेकडे लागले आहे.
यंदा रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ५६ गटांत निवडणूक होत असून तालुकानिहाय गटांची रचना लक्षवेधी ठरली आहे. मंडणगड तालुक्यात २, दापोलीत ६ खेडमध्ये ७, चिपळूणमध्ये ९, गुहागरमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक १० ५. संगमेश्वरमध्ये ७, लांजामध्ये तम राजापूरमध्ये ६ गटांचा समावेश आहे. या सर्व गटांमध्ये प्रमुख पक्षांसह स्थानिक आघाड्या व अपक्ष उमेदवार रिंगणात उत्तरल्याने अनेक ठिकाणी चुरशीच्या बहुरंगी लढती रंगल्या आहेत.
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत
पंचायत समिती स्तरावरही निर्माण झाली चुरस
काही गटांमध्ये पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धा तर काही ठिकाणी बडखोरीमुळे समीकरणे बदलल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून आले पंचायत समिती स्तरावरही निवडणुकीची चुरस तितकीच तीव्र आहे. जिल्ह्यातील ११२ गणांमध्ये मंडणगड ४, दापोली १२, खेड १४, चिपळूण १८. गुहागर १०, रत्नागिरी २०, संगमेश्वर १४, लांजा ८ आणि राजापुर १२ गणांचा समावेश आहे. गावपातळीवरील विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्थानिक रोजगार या प्रश्नांवर प्रचार झडला, स्थानिक गटबाजी, नातेसंबंध आणि नेतृत्वाचा प्रभाव निकालात निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ
जिल्हा परिषद अध्यक्षपदासह पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत यापूर्वीच निघाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समित्यांमध्ये राजापूर सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी, दापोली नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. मंडणगड, खेड, संगमेश्वर व लांजा येथे सर्वसाधारण महिला, तर चिपळूण, गुहागर व रत्नागिरी येथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सभापतीपद राखीव आहे. त्यामुळे स्थानिक सत्तासमीकरणांमध्येही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






