• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rss Mohan Bhagwat Reshimbagh Dasara Melava Nagpur Live Updates 2024

RSS चा विजयदशमी महोत्सव उत्साहात पार; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले हिंदूंना आवाहन

RSS Dasara Melava 2024 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचा विजयादशमी सोहळा पार पडला आहे. नागपूरमध्ये रेशीमबाग या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शस्त्र पूजन व संचलन करण्यात आले. यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर सरसंचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला संबोधित केले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 12, 2024 | 11:24 AM
rss centenary year dasara melava 2024 nagpur

शतकीय महोत्सवाकडे जाणारा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा नागपूरमध्ये विजयदशमी सोहळा पार (फोटो - एक्स)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

RSS Dasara Melava 2024 : नागपूर: देशभरामध्ये सर्वत्र साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा विजयादशमीचा उत्सव देशभरामध्ये गाजलेला आहे. नागपूरमध्ये आरएसएसचा सोहळा पार पडत असून यामध्ये प्रमुख पाहुण्यांसह सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अर्थात इस्रोचे माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन उपस्थित आहेत.

नागपूरमधील रेशीमबाग या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि पुजा सुरु आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील शाखांमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने उत्सवाचे वातावरण असून पथसंचलन करण्यात आले. मुसळधार पावसामुळे कार्यक्रमामध्ये कोणताही व्यत्यय आलेला नसून पावसामध्ये देखील पथसंचलन सुरू झाले. त्याचबरोबर विविध शस्त्रांची देखील पूजा करण्यात आली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व अस्त्र शस्त्रांची पूजा करुन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी संघ शतकोत्तर प्रवास सुरु करत असल्यामुळे भूमिका देखील स्पष्ट केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींची उपस्थिती आहे.

हे देखील वाचा : राज ठाकरेंचा डिजीटल दसरा मेळावा; पॉडकास्टच्या माध्यमातून पहिल्यांदा साधणार संवाद

यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूरमधील कार्यक्रमातून सर्व संघ सेवकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर यांचे स्मरण केले. तसेच देशातील विविध विषयांवर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, आपल्या देशाचा विचार करता तो पुढे मार्गक्रमण करत आहे. अशा सर्व क्षेत्रांमध्ये भारत पुढे जात आहे. समाजाची समजही वाढत आहे. परिणामी जम्मू-काश्मीरच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. याचाच परिणाम म्हणून जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. वसुधैव कुटुंबकम् हा आपला विचार सगळ्यांना मान्य आहे. आपला योग आणि त्याचं शास्त्रही जग स्वीकारत आहे. पर्यावरणाचा आपला दृष्टीकोन सर्वांनी स्वीकारला. आपल्या देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी चारित्र्याचे अनेक पैलू निर्दोष आणि परिपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या या सरावात आपण सर्वांनी सजग आणि सतत व्यस्त राहावे लागेल असे भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Earlier in the morning at 6:15 am, the swayamsevaks of Nagpur participated in the patha-sanchalan (route-march) . This #Vijayadashami It has been raining since early morning at Nagpur. #RSS100 pic.twitter.com/C76wz9dg1W

— RSS (@RSSorg) October 12, 2024

पुढे त्यांनी देशामध्ये सुरु असलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “मूल्यांच्या ऱ्हासाचा परिणाम आहे की, मातृत्वाची जबाबदारी” मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात मातृशक्तीला अनेक ठिकाणी बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कोलकाताच्या आर.जी. कार हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणारी घटना आहे. एवढा मोठा गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले जातात. त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि वाईट संस्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हे दिसून येते.  बांगलादेशातून भारतात होणारी बेकायदेशीर घुसखोरी आणि परिणामी लोकसंख्येचा असमतोल हा देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या अवैध घुसखोरीमुळे परस्पर सौहार्द आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याक बनलेल्या हिंदू समाजाला औदार्य, मानवता आणि सद्भावना यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांची, विशेषतः भारत सरकार आणि जगभरातील हिंदूंची मदत आवश्यक आहे. असंघटित आणि दुर्बल राहणे म्हणजे दुष्टांच्या अत्याचारांना आमंत्रण देणे, हा धडा जगभरातील हिंदू समाजानेही घेतला पाहिजे. पण प्रकरण इथेच थांबत नाही. आता भारतातून सुटण्यासाठी पाकिस्तानला भेटल्याची चर्चा आहे. अशा चर्चा घडवून भारतावर कोणकोणत्या देशांना दबाव आणायचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्याची उपाययोजना हा शासनाचा विषय आहे, असे मत मोहन भागवत यांनी मांडले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा नागपुर में आयोजित विजयादशमी उत्सव के अवसर पर शस्त्र पूजन करते हुए सरसंघचालक मोहन भागवत जी और प्रमुख अतिथि पद्म भूषण डा. के. राधाकृष्णन।
समस्त देशवासियों को श्री विजयादशमी की हार्दिक शुभकामनाएं #RSS100 pic.twitter.com/agzn7MO5Gn

— RSS (@RSSorg) October 12, 2024

मोहन भागवत यांनी हिंदूंना संघटित होण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूच नाही तर इतर अल्पसंख्यांकावर हल्ला चढवले. पण येथील हिंदू एकत्रित आले. संघटनेतून त्यांनी या अन्यायाला वाचा फोडली. दुर्बलता हा अपराध आहे, दुर्बलता म्हणजे अत्याचाराला निमंत्रण देणे आहे. त्यामुळे हिंदू समाजाने संघटन करणे आवश्यक आहे. सशक्त राहावे. केवळ बांगलादेशातच नाही तर भारतात पण हा धोका आहे. आपल्या देशात पण त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात, समाजा-समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. फुटीरता आणण्याचे प्रयत्न सुरू असून ते ओळखता आले पाहिजेत. काही जण नॅरेशन तयार करत आहेत. ते कोण करत आहेत त्यांचा नाव घेण्याची गरज नाही.

Web Title: Rss mohan bhagwat reshimbagh dasara melava nagpur live updates 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • Dasara Melava
  • RSS

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.