प्रदक्षिणा घालताना वेगळाच नजारा
सांप्रदायिक भिक्षेमध्ये समर्थ रामदास स्वामींचे वंशज, महत, मठपती,मानकरी उपस्थित होते. स. १०.३० वा. आरती, छबीना मानाच्या १३प्रदक्षिणा झाल्या. यावेळी रामा, रामा हो रामा… असे पद म्हणतरामदास स्वामी संस्थान, श्री समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी, मानकरीतसेच हजारो समर्थ भक्त मंदिराला प्रदक्षिणाघालताना एक वेगळाचनजारा पाहायला मिळत होता. दु. १२ वा. सुरेशबुवा सोन्ना रामदासी श्रीसमर्थ निर्वाण कथा समर्थ भक्त कथन करताना अनेकांचे डोळे पाणावलेहोते.समर्थाच्या शेजघरापुढील भव्य मंडपामध्ये ही कथा ऐकताना हजारोसमर्थ भक्तांनी गर्दी केली होती. दुपारी साडेबारापासून संस्था आणिसमर्थ सेवा मंडळाच्या वतीने महाप्रसादाच्या आयोजनामध्ये हजारो समर्थ भक्तांनी भात, आमटी तसेच खिरीचा प्रसाद घेऊन तृप्त मनाने गड
उतरण्यास सुरुवात केली. रात्री साडेनऊ वाजता कीर्तनसेवा झाली.
भक्तनिवास येथील श्रीसमर्थ दासबोध ग्रंथ पारायणाची सांगता
श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या वतीनेही श्रीधर कुटी येथे दैनंदिन उपासना, श्रीधर स्वामीच्या पादुकांना अभिषेक दासबोध पारायण आदी कार्यक्रम करण्यात आले, भक्तनिवास येथे सुरू असलेल्या श्री समर्थ दासबोध ग्रंथ पारायणाची सांगता झाली. विद्याधर बुवा वैशंपायन व रसिका ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण गेले नऊ दिवस सुरू होते. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष हभप गुरुनाथमहाराज कोटणीस यांनी दासनवमी या विषयावर सुश्राव्य प्रवचन केले. श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने माऊली ब्लड बैंक सातारा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या या उपक्रमाला समर्थ भक्तानी मोठा प्रतिसाद दिला.
दर अर्ध्या तासाला सातारा येथून गाड्या
मंदिर परिसरात अनिरुद्ध बापू आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वयंसेवक भाविकांच्या रांगांसाठी तैनात करण्यात आले होते. सज्जनगडावर येण्यासाठी सातारा एसटी आगारातर्फे विशेष यात्रा स्पेशल गाड्या दर अर्ध्या तासाला सातारा येथून सोडण्यात आल्या होत्या. गुरुवारी या महोत्सवाची सांगता लळिताच्या कीर्तनाने झाल्याची माहिती समर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त श्री स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेशबुवा रामदासी यांनी दिली. महोत्सवाची सांगता झाली तरी महाशिवरात्रीपर्यंत परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. दरम्यान, श्री समर्थ सेवा मंडळातर्फे सातारा शहरातील समर्थ सदन, सांस्कृतिक केंद्र येथे सुरू असलेल्या ग्रंथराज दासबोध पारायणाची बुधवारी सांगता करण्यात आली. या ठिकाणी असणाऱ्या श्री समर्थांच्या मूर्तीला विशेष अभिषेक व पूजा करून सुशोभित करण्यात आले होते.






