मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बियाणे करण्यात आले. निवेदनात सांगली जिल्ह्यात महापुरानंतर आणि वाढत्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत दिवसा विनाअडथळा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, नवीन वीज कनेक्शनवरील बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोलरपंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात
तसेच सोलर पंप अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, सोलर पंप खरेदीबाबत शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे आणि गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलर पंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. अन्यथा शेतक-यांची सहनशीलता संपत चालली असून, भविष्यातील आंदोलनासाठी शासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. मोर्चात भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री चंदन उर्फ पाटील, जिल्हाध्यक्ष अंबादासजी माळी, जिल्हा उपाध्यक्ष महावीरजी कावे, जिल्हा मंत्री अजितजी जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष नितेशजी लोहार, शेतकरी नेते संदीप गिड्ढे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सोलरपंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात
सोलर पंप अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, सोलर पंप खरेदीबाबत शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे आणि गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलर पंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. अन्यथा शेतकऱ्यांची सहनशीलता संपत चालली असून, भविष्यातील आंदोलनासाठी शासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. मोर्चात भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री चंदन उर्फ पाटील, जिल्हाध्यक्ष अंबादासजी माळी, जिल्हा उपाध्यक्ष महावीरजी कावे, जिल्हा मंत्री अजितजी जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष नितेशजी लोहार, शेतकरी नेते संदीप गिड्ढे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.






