• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Ganesh Naiks Entry Into Mira Bhayander After 11 Years On The Occasion Of Janata Darbar

Mira Bhayandar News: तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!

गणेश नाईक हे त्यांच्या जनता दरबारामुळे विशेष लोकप्रिय ठरत आहे. आता हाच जनता दरबार मिरा-भाईंदरमध्ये होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 12, 2025 | 08:23 PM
तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!

तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तब्बल 11 वर्षांनंतर गणेश नाईक मिरा-भाईंदरच्या राजकारणात सक्रिय
  • 15 नोव्हेंबरला गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे मिरा-भाईंदरमध्ये आयोजन
  • जनता दरबाराच्या माध्यमातून भाजपला संघटनात्मक बळ मिळणार

राजकारणात तब्बल अकरा वर्षांच्या विश्रांतीनंतर ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा मिरा-भाईंदरच्या राजकारणात सक्रिय होत आहेत. शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते जनता दरबार घेणार असून या उपक्रमामुळे भाजपला मोठे बळ मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

JJ Hospital: जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ; MRI मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा थेट ‘तीन महिन्यांवर’

१५ नोव्हेंबरला गणेश नाईकांचा जनता दरबार

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात हा जनता दरबार होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांना आपल्या तक्रारी व समस्या थेट मांडण्याची संधी मिळणार असून, संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश देणार आहेत. भाजपने नागरिकांना आवाहन केले आहे की, “शासनापर्यंत आपली अडचण पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा.”

भाजपला मिळणार नवसंजीवनी

राजकीय विश्लेषकांच्या मते, गणेश नाईकांच्या पुनरागमनामुळे भाजपला मिरा-भाईंदरमध्ये नवसंजीवनी मिळेल. २०१४ पूर्वी नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरात त्यांचा प्रचंड प्रभाव होता. पालकमंत्री म्हणून तसेच त्यांचे पुत्र संजय नाईक खासदार असताना त्यांनी समर्थकांची मोठी फळी उभी केली होती.

नंतरच्या राजकीय घडामोडींमुळे ते काही काळ शहराच्या राजकारणापासून दूर राहिले, मात्र आजही त्यांचा एक मजबूत समर्थकवर्ग कायम आहे. यामुळे भाजपला संघटनात्मक पातळीवर मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजप-शिवसेना मतभेदांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम चर्चेत

सध्या मिरा-भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद उघडपणे दिसून येत आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे.

Maharashtra local body elections: महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का

सरनाईक यांनी अलीकडच्या काळात भाजपमधील नाराज नेत्यांना आपल्या गोटात घेतले असून, त्यामुळे शिवसेनेची संघटना मजबूत झाली आहे.अशा पार्श्वभूमीवर गणेश नाईकांची एन्ट्री म्हणजे सरनाईकांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपची रणनीतिक चाल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राजकीय पुनरागमनाचे संकेत

गणेश नाईक यांनी अलीकडेच ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनता दरबारात सक्रिय सहभाग घेतला होता, आणि त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. आता मिरा-भाईंदरमध्येही ते लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनरागमनाची औपचारिक सुरुवात झाली, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपचा रणनीतिक डाव

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच भाजपने नागरिकांशी थेट संपर्क वाढविणे आणि संघटनात्मक बळकटी साधणे या उद्देशाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जनता दरबारांची मालिका सुरू केली आहे. मिरा-भाईंदरमधील जनता दरबार हा त्याच मालिकेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

राजकीय विश्लेषकांचे मत

“गणेश नाईक हे ठाणे आणि मिरा-भाईंदरच्या सामाजिक-राजकीय पटावर अजूनही प्रभावशाली आहेत.
त्यांच्या पुनरागमनामुळे भाजपला संघटनात्मक आत्मविश्वास मिळेल आणि मतदारांमध्ये नव्या ऊर्जेची भावना निर्माण होईल.” असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गणेश नाईकांच्या पुनरागमनामुळे मिरा-भाईंदरचे राजकारण नव्या समीकरणांच्या उंबरठ्यावर उभे आहे.
भाजपसाठी हे पुनरागमन केवळ एक कार्यक्रम न राहता, आगामी निवडणुकांचा रणनीतिक वळण ठरू शकते, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.

Web Title: Ganesh naiks entry into mira bhayander after 11 years on the occasion of janata darbar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • Ganesh Naik
  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण
1

Ahilyanagar News: पांढरीपूल घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प! खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव
2

टोमॅटो पिकाच्या दरात वाढ! उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; घाऊक बाजारात आवक वाढूनही वधारले भाव

Nashik News: जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार; मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आश्वासन
3

Nashik News: जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार; मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आश्वासन

भाईंदरमध्ये जमिनीवर कब्जाचा प्रयत्न! ३० जणांना अटक, १८ आरोपी न्यायिक कोठडीत
4

भाईंदरमध्ये जमिनीवर कब्जाचा प्रयत्न! ३० जणांना अटक, १८ आरोपी न्यायिक कोठडीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला स्फोट ‘आतंकी हल्ला’च; केंद्र सरकारकडून तीव्र निषेध, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nov 12, 2025 | 09:41 PM
Delhi Bomb Blast होणार याची आधीच झाली होती भविष्यवाणी? Viral पोस्टने उडाली एकच खळबळ

Delhi Bomb Blast होणार याची आधीच झाली होती भविष्यवाणी? Viral पोस्टने उडाली एकच खळबळ

Nov 12, 2025 | 09:38 PM
PAK vs SL 1st ODI : 36 वर्षांनंतर पाकिस्तानचा पुन्हा ‘तो’ कारनामा! भारतासोबत जोडला जातोय ‘खास’ संबंध 

PAK vs SL 1st ODI : 36 वर्षांनंतर पाकिस्तानचा पुन्हा ‘तो’ कारनामा! भारतासोबत जोडला जातोय ‘खास’ संबंध 

Nov 12, 2025 | 09:35 PM
पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर होणारे परिणाम! जाणून घ्या

पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर होणारे परिणाम! जाणून घ्या

Nov 12, 2025 | 09:23 PM
Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?

Nov 12, 2025 | 09:11 PM
Tri series: विहान मल्होत्राची ​​१९ वर्षांखालील ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी वर्णी! भारत ‘ब’ आणि अफगाणिस्तान यांच्याची असेल स्पर्धा 

Tri series: विहान मल्होत्राची ​​१९ वर्षांखालील ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी वर्णी! भारत ‘ब’ आणि अफगाणिस्तान यांच्याची असेल स्पर्धा 

Nov 12, 2025 | 09:02 PM
Devendra Fadnavis: “भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Nov 12, 2025 | 08:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.