राजकुमार हिरानी ते मोजेझ सिंग या चित्रपट निर्मात्यांनी भारतीय चित्रपटामधील चित्रपटामध्ये अनेक कथा आणि वेगवेगळी पात्र प्रेक्षकांच्या समोर आणून, या सिनेमासृष्टीत कायापालट घडवून आणली आहे. गेल्या काही वर्षांत दिग्दर्शकांची दृष्टी आणि कथा सांगण्याची शैली ही बदलली असून यात अनेक दिग्दर्शकांचा मैलाचा वाटा आहे. राजकुमार हिरानी, मोजेझ सिंग आणि इतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी या सतत बदलत जाणाऱ्या लँडस्केपवर यशस्वीपणे काम करून अनेक चित्रपट सुपरहिट केले आहेत. या निर्मात्यांच्या सगळ्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
राजकुमार हिरानी ते मोजेझ सिंग असे चित्रपट निर्माते ज्यांनी त्यांच्या अष्टपैलुत्वाने भारतीय चित्रपटाचा कायापालट केला आहे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
राजकुमार हिरानी हे आकर्षक आणि भावनिकदृष्ट्या गुंजणाऱ्या कथा रचण्यात उत्कृष्ट आहेत 'मुन्ना भाई एमबीबीएस', 'संजू' आणि 'पीके' हे इतर चित्रपट त्याचा पुरावा आहेत. त्यांचे चित्रपट जे सहसा संबंधित थीम आणि सामाजिक समस्यांना संबोधित करतात.
तुषार हिरानंदानी या चित्रपट निर्मात्याने ‘सांड की आंख’ आणि अलीकडच्या राजकुमार राव-स्टार ‘श्रीकांत’ सारख्या चित्रपटांद्वारे आपले दिग्दर्शन कौशल्य दाखवले आहे. तसेच त्यांनी 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' या दूरचित्रवाणी मालिकेचे दिग्दर्शनही देखील केले होते.
मोझेझला सिंग या चित्रपट निर्मात्याचे चित्रपट अनेकदा समाजासमोर आरसा म्हणून उदयास आले आहेत. मोझेझला काय वेगळे करता येत याकडे त्याचा कायम कल असतो. 'जुबान' आणि 'ह्यूमन' हे त्यांचे दिग्दर्शनाचे प्रकल्प या चित्रपट निर्मात्याच्या आकर्षक कथा तयार करण्याच्या कौशल्याचा पुरावा आहेत.
रीमा कागती या चित्रपट निर्मात्या 'हनीमून ट्रॅव्हल्स PVT LTD' सारख्या चित्रपटातील नात्यातील गुंतागुंतीं मधली गोष्ट असो किंवा 'दहाड' या चित्रपटाद्वारे रीमा कागतीने स्वतःसाठी एक खास जागा तयार केली आहे जे तिच्या भावनिकतेसाठी ओळखली जाते.
गौरी शिंदे दिग्दर्शित 'इंग्लिश विंग्लिश, एक सामान्य स्त्रीचे हृदयस्पर्शी चित्रण होते. डिअर जिंदगी'सोबत तिने आधुनिक नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा शोध घेतला. गौरी शिंदे यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्यपूर्ण पात्रे आणि सूक्ष्म सामाजिक भाष्य करून जातात.