फोटो सौजन्य - Social Media
Bigg Boss Marathi विजेता आणि सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. दरम्यान, मराठी मुद्द्यामुळे त्यानेही त्याच्या वडिलांसह प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय केळकरचे वडील स्वतः ठाणे-कळव्यात रिक्षाचालक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की “Covid च्या वेळी या सगळ्यांना त्यांना गावी पोहचवण्यासाठी मदत करणारे मराठी माणसंच होती ना! इथे कमवता आणि इथलंच खाता, मग मराठी बोलायला कसली लाज वाटते?” असा प्रश्न अक्षयच्या वडिलांनी उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “रिक्षा थांबवून जेव्हा तंबाखू मागण्यासाठी आमच्याकडे येतात, त्याऐवजी मराठी भाषेत चार प्रश्न आम्हाला विचारा!” या सगळ्या गोष्टीत अक्षयच्या वडिलांनी महत्वाचा मुद्दा उचलून धरला.
ते म्हणाले की, “यातल्या काही रिक्षाचालकांकडे Permit नाही. तरीही ते रिक्षा चालवतात. तर यातले काही रिक्षाचालक एक नव्हे तर तीन-चार Permit घेऊन फिरत आहेत.” यामुळे अक्षयच्या वडिलांनी संबंधित अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. एका रिक्षाचालकाकडे एकच Permit असला पाहिजे, मग एका कडे तीन चार Permit कसे असू शकतात? त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
अक्षय केळकरसह, मराठी सिनेसृष्टीतून हेमंत ढोमे, राखी सावंत, रितेश देशमुख तसेच अंशुमन विचारेनेही मराठी मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.






