साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही, उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त
पोशीर येथील शेतकरी यांना न्याय देण्यासाठी किसान क्रांती संघटना यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. पत्रकार परिषदेत रोशन हबले यांनी कर्जत तालुक्यातील पोशीर गावांमधील शेतकऱ्याला रस्ता मिळावा यासाठी किसान क्रांती संघटना यांनी कर्जत तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता. त्यातच कळंब मंडल अधिकारी यांनी पंचनामा करून सादरी केले आहे. परंतु अद्याप त्याचे शेतकऱ्याला उत्तर मिळाले नाही. पोशीर येथील जमीन मालक साजिद हसिम मुश्रीफ यांच्या नावावर असून त्यांच्या जमिनीचे रखवालदार यांनी दगडी कुंपण यांची बांधकाम करून घेतले असून, शेतकऱ्यावर खोटे आरोपही करण्यात आले. त्यामध्ये पैशाच्या खंडणीसाठी, शेतकऱ्यांला फसवून जमीन हडप करण्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर शेतकरी रोशन परशुराम हाबळे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात आले.
Satara News: शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध
याबाबत पत्रकार परिषदेत रोशन परशुराम हाबले यांनी मी तहसीलदार यांना शेती करण्यासाठी मला रस्ता मिळावा यासाठी अर्ज केला आहे.यामध्ये कुठेही पैशाची मागणी केली नाही तरी हा खोटा आरोप करून माझे नाव बदनाम केले जात आहे.जमीन खरेदी पूर्ण व्यवहार करूनच केली आहे. त्या शेतकऱ्याला दारू पाजून मी ही जमीन खरेदी केली नाही. त्यासाठी शेतजमीन मालक स्वतः आले असून त्यांनीही याबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे.फोनवरून धमक्याही देण्याचे काम करत असल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग सादर करून रोशन हबले यांनी यावेळी पत्रकारांवर ऐकवले.तेथे दगडी कोट बांधून आमची अडवणूक करून आमची जमीन विकण्यास भाग पाडत आहेत. त्यांना आमची हवी असून जमीन विकावी यासाठी त्यांना वारंवार रस्ता अडवून त्रास दिला जात आहे तर आमच्यावर केलेले आरोप खोटे आहेत.
कोणत्याही प्रकारे खंडणी मागतली नाही किंवा आम्हाला कुठलीही खंडणी नको आमच जे पुर्वीचा शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. हा रस्ता आम्हाला खुला करून देण्यात यावा येवढीच आमची मागणी आहे. येथील रखवालदार यांनी जमिनी घेण्यासाठी मला दारू प्यायला नेले आणि शेजारी असलेल्या जमीन मालक महिला यांनी माझ्या कानाखाली मारली हे खोटे आरोप तेथील रखवालदार याने केले आहेत.
किसान क्रांती संघटना यांच्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहून बाजू मांडत आहे.माझी फसवणूक झाली आहे हे बोलण्याचा अधिकार माझा आहे हा अधिकार यांना दिला कोणी?तसेच तेथील साजिद हसन मुश्रीफ यांचे रखवालदार यांनी जर आम्हाला किंवा कुंटुंबाला काही हानी पोहचवली तर या सर्व गोष्टींना जबाबदार मंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा असणार आहे. यांच्या बाबत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करू असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. येणाऱ्या काळात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर कर्जत तहसीलदार कार्यालय येथे आमरण उपोषण केले जाईल.
जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल तेथे किसान क्रांती संघटना त्यांच्या पाठीशी उभे राहील, महाराष्ट्र शासनाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते खुले करण्यात येत आहेत. त्यातच शेतकऱ्याचा शेतीकडे जाण्याचा रस्ता अडवला जात आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ता अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अडवणूक केली जात असेल तर किसान क्रांती संघटना गप्प बसणार नाही.






