दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे वारंवार छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा आम्लपित्त इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात उष्णता वाढण्यासोबतच काहीवेळा ऍसिडिटी होऊन छातीत जळजळ होते. जेवणात चवीने आणि आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटात उष्णता आणि जळजळ वाढते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)
'या' पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढते तीव्र उष्णता

तळलेल्या किंवा मसालेदार पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. पोटाला ही चरबी पचवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. खाल्ले अन्नपदार्थ पचन न झाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढून शरीराला हानी पोहचते.

द्राक्ष, लिंबू, संत्री आणि टोमॅटो यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिकरित्या आम्ल असते. त्यामुळे उपाशी पोटी आंबट फळांचे सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढण्यासोबतच पित्ताचे प्रमाण सुद्धा वाढते.

सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास ऍसिडिटी वाढण्यासोबतच आंबट ढेकर येणे, आम्ल्पित्ता, छातीत जळजळ इत्यादी समस्या उद्भवू लागतात.

चॉकलेट आणि पेपरमिंट या दोन्ही पदार्थांमध्ये पित्ताचे प्रमाण जास्त असते. हॉट चॉकलेट किंवा पेपरमिंट खाल्ल्यामुळे काहीवेळा पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.

चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, बर्गर आणि पिझ्झा यांसारख्या जंक फूडमध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ शरीराला हानी पोहचवतात.






