दैनंदिन आहारात फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर कायमच देतात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. बदलत्या ऋतूनुसार बाजारात वेगवेगळी हंगामी फळे उपलब्ध होतात. पेरू, द्राक्ष, सफरचंद, पपई, केळी इत्यादी सर्वच फळे शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहेत. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये फळे खाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी फळे कापून डब्यात भरून खाण्यासाठी नेली जातात. पण १ तासानंतर कापून ठेवलेली फळे पूर्णपणे काळी पडतात आणि चव बिघडून जाते. फळांमधील ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
कापून ठेवलेली फळे लगेच काळी पडून जातात? फळांचा ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

कापून ठेवलेल्या फळांचा रंग बदल्यानंतर सुद्धा फळे खराब होत नाहीत. फळ हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यातील एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे फळांचा रंग बदलून जातो.

उष्ण हवामान आणि अयोग्य साठवणूक यामुळे फळे खराब होण्याची जास्त शक्यता असते. फळांची योग्य साठवणूक केल्यास फळे दीर्घकाळ व्यवस्थित ताजी आणि फ्रेश राहतात.

कापून ठेवलेल्या सफरचंद, केळी, पेर इत्यादी फळांवर थोडासा लिंबाचा रस टाकावा. लिंबामधील विटामिन सी आणि एस्कॉर्बिक ॲसिड असते, ज्यामुळे एन्झाइम्सना हवेच्या संपर्कात आल्यावर रंग बदलण्यापासून रोखते.

कापून ठेवल्यानंतर फळे लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावी. हवेचा संपर्क जेवढा कमी येईल तेवढीच फळे जास्त वेळ व्यवस्थित ताजी आणि फ्रेश राहतील.

फळांचा नैसर्गिक रंग कायम टिकवून ठेवण्यासाठी फळे स्वच्छ भांड्यात आणि स्वच्छ सुरीचा वापर करून कापावीत. अन्यथा फळांमध्ये विषाणू झपाट्याने वाढतात.






