दैनंदिन आहारात नेहमीच फळांचे सेवन केले जाते. फळे खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. डॉक्टरांच्या मते, नियमित एक सफरचंद खाल्ल्यास कधीच तुम्ही आजारी पडणार नाही. शरीर कायमच तंदुरुस्त राहील आणि तुम्ही फ्रेश दिसाल. बाजारातून फळे विकत आणल्यानंतर ती जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहावी म्हणून फ्रिजमध्ये ठेवली जातात. पण फ्रिजमध्ये ठेवलेली ही फळे दीर्घकाळ टिकवण्याऐवजी लवकर खराब होऊन जातात. फ्रिजमधील थंड वातावरणात फळे सुकून जाण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब

अननस विकत आणल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेर तसाच ठेवावा. न कापलेला अननस फ्रिजमध्ये ठेवल्यास सुकून जाण्याची शक्यता असते. चांगल्या तापमानात अननस राहिल्यास तो लवकर पिकतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगड आणल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. असे केल्यामुळे कलिंगडमधील पाणी पूर्णपणे सुकून जाते.

पिकलेली केळी कायमच सामान्य खोलीमध्ये तापमानात ठेवावी. जास्त थंड किंवा उष्ण ठिकाणी ठेवल्यास केळी लवकर खराब होऊन जातील. केळीची साल पूर्णपणे काळी पडून जाते.

लिची हे उष्णकटिबंधीय फळ आल्यामुळे सामान्य खोलीतील तापमानात व्यवस्थित टिकून राहते. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर लिची लगेच खराब होते.

आंब्याचा सीजन सुरु झाल्यानंतर कच्चे आंबे फ्रिजमध्ये आणून ठेवले जातात. पण असे केल्यामुळे कच्ची कैरी पूर्णपणे खराब होऊन जाते. चव खराब झाल्यानंतर कच्चा आंबा फेकून दिला जातो.






