उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढते आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. अपचन किंवा ऍसिडिटी वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स किंवा फोड येतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात या भाज्या आणि फळांचे आवर्जून सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यातही चेहरा दिसेल फ्रेश! दैनंदिन आहारात नियमित करा 'या' फळे भाज्यांचे सेवन, शरीराला होतील फायदे

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची खावी. यामध्ये असलेले गुणकारी घटक पचनक्रिया निरोगी ठेवतात. तसेच दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असते. दुधी भोपळा त्वचा मऊ ठेवतो.

डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्ल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.

कलिंगड हे उन्हाळी फळ आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कलिंगड खावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागल्यानतंर कोणताही तिखट तेलकट पदार्थ खाण्याऐवजी फळे खावीत.

विटामीन सी युक्त लिंबाचा रस संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे. तसेच लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात.

आंबट गोड चवीची रसाळ लिची सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. लिचीचे सेवन केल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहते. याशिवाय चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो.






