भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना सुरु आहे, यामध्ये टीम इंडीयाच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच डावामध्ये तीन शतक ठोकले. यामध्ये ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकले. WTC सायकलला सुरुवात झाली आहे. WTC मध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे भारतीय कोणते यासंदर्भात सविस्तर वाचा.
WTC सायकलमध्ये भारताचे सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज - फोटो सौजन्य - BCCI

भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा सर्वाधिक शतक मारण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्याने आतापर्यत ९ शतक मारले आहेत. फोटो सौजन्य - BCCI

या यादीमध्ये भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल आहे, त्याने सुरु असलेल्या सामन्यात शतक ठोकुन रोहीत शर्माची बरोबरी केली आहे. त्यानेदेखील नऊ शतक ठोकले आहेत. फोटो सौजन्य - BCCI

तिसऱ्या स्थानावर भारताचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल आहे, त्याने भारतासाठी त्याच्या लहानश्या करिअरमध्ये WTC सायकलच्या सामन्यात 5 शतक पुर्ण केले आहेत. फोटो सौजन्य - BCCI

भारताचे उपकर्णधार ऋषभ पंत या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे, त्यांनी आत्तापर्यंत पाच शतक नावावर केले आहेत. या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने शतक पूर्ण करून विराट कोहलीची बरोबरी केले आहे. फोटो सौजन्य - BCCI

WTC सायकलमध्ये सर्वाधिक शतक झळकावऱ्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर भारताचा स्टार विराट कोहली आहे. त्यांने आत्तापर्यंत पाच शतक डब्ल्यूटीसीमध्ये पूर्ण केले आहेत, त्यांने आत्ता मागील महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. फोटो सौजन्य - BCCI






