वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागडा डाएट, तासनतास व्यायाम तर कधी सप्लिमेंट्स पिऊन वजन कमी केले जाते. पण कालातंराने पुन्हा एकदा शरीरावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागते आणि लठ्ठपणा वाढतो. शरीरात साचून राहिलेली अनावश्यक चरबी आणि घाण आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे वजन कमी करताना इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी काकडी आणि पुदिन्याच्या पानांचे डिटॉक्स वॉटर प्यावे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

काकडीमध्ये असलेल्या फायबर युक्त घटकांमुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.

एक लिटर पाण्यात काकडीचे तुकडे, लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याची घालून रात्रभर तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास महिनाभरात वजन कमी होण्यास मदत होईल.

काकडी आणि पुदिन्याच्या रसात कॅलरीज कमी करणारे घटक असतात. याशिवाय दिवसभरात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल.

गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या सर्वच समस्यांपासून पुदिन्याची पाने खूप जास्त फायदेशीर ठरतात. तसेच रोजच्या जेवणात सुद्धा पुदिन्याची पाने चावून खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहील.

काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काकडी पुदिन्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखले जाते आणि आरोग्य सुधारते.






