'सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे...'; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण अधिकच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्या अलीकडील भेटीबाबत विचारण्यात आले असता, कदम यांनी जयंत पाटील यांच्या कार्याचे खुलेपणाने कौतुक केले. विरोधी पक्षातील नेत्याबाबत केलेल्या या सकारात्मक वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे होऊ शकत नाहीत,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका बाजूला आशिष शेलार यांची भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट, दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्याबाबत रामदास कदम यांनी व्यक्त केलेले कौतुक आणि तिसऱ्या बाजूला सुनील तटकरे यांच्यावर केलेली जहरी टीका, या सर्व घडामोडींमुळे रत्नागिरीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात या भेटी आणि वक्तव्यांमुळे कोणती नवी राजकीय समीकरणे आकार घेतात, तसेच त्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या भेटीनंतर कोकणाच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असून मंत्री आशिष शेलारांच्या भास्कर जाधवांच्या कार्यालय भेटी मागे राजकीय संदेश काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर या भेटीमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार अशा नव्या चर्चाही कोकणात रंगल्या असून यावर भास्कर जाधव कोणते स्पष्टीकरण देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






