ते नॉन-बायोलॉजिकल पीएम अशी कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राहुल गांधी हे कोल्हापूरामध्ये असणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये जोरदार प्रचाराचा धुराळा उडणार आहे. दरम्य़ान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी कॉंग्रेस नेत्याने जोरदार टीका केली आहे. ‘ते नॉन-बायोलॉजिकल पीएम असल्याचे म्हणत कॉंग्रेस नेत्यांनी टीकास्त्र डागलं आहे.
कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स (ट्वीटर) पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. नॉन-बायोलॉजिकल पीएम आज महाराष्ट्रातील वाशिम आणि ठाणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी चार प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असे म्हणत जयराम रमेश यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत.
नॉन-बायोलॉजिकल पीएम आज महाराष्ट्रातील वाशिम आणि ठाणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी चार प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत: 1. जाती जनगणनेच्या मुद्द्यावर आणि सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणावरील 50% ची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावर… pic.twitter.com/LsT4p6Bn36 — Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) October 5, 2024






