ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस, गिरीश महाजन यांचे वादग्रस्त विधान
शीख विभाजनवादी मृत नेता भिंद्रनवाले याचे उद्दात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावणारे गिरीश महाजन हे भाजपचे पहिलेच मंत्री ठरले आहेत. या कार्यक्रमात ‘ऑपरेशन ब्लु स्टार’ च्या दिवसाला ‘काळा दिवस’ म्हणून महाजनांनी संबोधल्याने आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या कार्यक्रमात भिंद्रनवालेचा उल्लेख ‘शहिद’म्हणून केला गेल्याने आता अजून खळबळ उडाली आहे. अश्या कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावल्याने गिरीश महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
दमदमि टकसालच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शीख संत, धार्मिक नेते आणि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्यासपीठावर दमदमि टकसालचा माजी प्रमुख जर्नेलसिंह भिंद्रनवाले, जनरल सुभेगसिंह, शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष अमरिकसिंह यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. याशिवाय ऑपरेशन ब्लु स्टारदरम्यान नुकसान झालेल्या अकाल तख्ताचे छायाचित्रदेखील लावले होते. गिरीश महाजन यांनी यावेळी ऑपरेशन ब्लु स्टारच्या फिवसाला काळा दिवस संबोधत ‘तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिर परिसरात सैन्य पाठवून शीख समाजावर अन्याय केल्याचे’ त्यांनी यावेळी म्हंटले.
या कार्यक्रमात उपस्थित होत महाजन म्हणाले, “ज्याप्रकारे आपले हजारो बंधू भगिनी हुतात्मा झाले आणि लष्कराने आपल्या पवित्र स्थळावर कारवाई केली, ते वेदनादायक होते. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या पवित्र स्थळी बळजबरीने सैन्य पाठवले आणि निष्पाप लोकांना अत्यंत क्रूरपणे मारले,” असा आरोप त्यांनी केला. पुढे, त्यांनी या घटनेची तुलना अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली. ते म्हणाले, “इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात झालेल्या शीखविरोधी दंगलीत हजारो लोक मारले गेले, मात्र कोणालाही शिक्षा झाली नाही. त्या घटनांची किंमत काँग्रेस आजही मोजत आहे. देशाच्या जनतेने त्यांना नाकारलेले आहे,” असे ते म्हणाले.
ममता बॅनर्जी यांना ऑफर; सोनिया गांधींनी थेट ‘या’ पदाचाच दिला प्रस्ताव?






