व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली (फोटो - सोशल मीडिया)
आमदार रोहित पवार हे राजेंद्र पवार, युगेंद्र पवार आणि वकीलांसह बारामती पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र , तेथे पोलिसांनी एफआयर नोंदवण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र याठिकाणी देखील रोहित पवार आणि पोलिसांची शाब्दिक चकमक झाली.
हे देखील वाचा : बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच
यानंतर पत्रकार परिषद घेत रोहित पवार म्हणाले की, “अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला न्याय का मिळत नाही? त्यांच्या मृत्यूनंतर देखील विमान कंपनीला का वाचवले जात आहे. अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही एफआयआर का घेतला जात नाही? त्यांना न्याय का मिळत नाही ? त्यांच्या मृत्यूला महिना होत आलाय, तरी इतक्या दिवसात काहीच का झालं नाही ?” असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत.
VIDEO | Baramati: During a press conference, NCP(SP) MLA Rohit Pawar (@RRPSpeaks) says, “The DGCA has acknowledged non-compliance by the VSR company in the Learjet 45XR case. I questioned why, if the remaining aircraft were grounded, a faulty aircraft was given to Ajit Dada. We… pic.twitter.com/kgfOhpuyJa — Press Trust of India (@PTI_News) February 26, 2026
दादांच्या बाबत एफआयआर घेतला जात नाही
पुढे रोहित पवार म्हणाले की, “पोलीस एफआयआर करण्यास नकार देत होते. त्यांचं म्हणणं की अॅक्सिडेंट रिपोर्ट झाला आहे. दादांचा आतापर्यंत अॅक्सिडेंट रिपोर्ट झाला. सीआयडी चौकशी करत आहे हे सांगितलं. पण अॅक्सिडेंट रिपोर्ट झाल्यावर क्रिमिनल अँगलने चौकशी का करत नाही. त्यानंतरही एफआयआर का घेत नाही. दादांच्या बाबत एफआयआर घेतला जात नाही. आम्ही तपास यंत्रणाच्या आड येत नाही. कुणीही चौकशी करावी. आमचं म्हणणं आहे की एफआयआर दाखल करा आणि तो सीआयडी किंवा सीबीआयला द्या, दादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी त्यांच्या मोठ्या मित्राने तरी मदत करावी,’ अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
हे देखील वाचा : सोशल मीडिया किंग! पंतप्रधान मोदी ठरले 10 कोटी फॉलोवर्स असणारे जगातील एकमेव नेते
पुढे रोहित पवार म्हणाले की, “आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. आम्ही फक्त कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर काहीतरी दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांच्या डोळ्यात देखील पाणी आले. मात्र त्यांना दबावाखाली काम करावं लागत आहे. काल जसे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता. तसाच इथे दबाव जाणवत होता. हे कार्यालय अजितदादांनी बांधलं आहे. त्यांनी पोलीस आणले. त्यामुळे चौकशीची मागणी करत आहोत. आता पोलीस म्हणतात आम्हाला एक तास द्या, आम्ही पोलिसांना सर्व पुस्तके वाचून दाखवली. नियम दाखवले. आता अधिकारी सकारात्मक दाखवायला लागले,” असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.






