अवकाळी पावसाचा हापूसला फटका (फोटो- gemini)
आंबा, काजू बागायतदार संकटात
शासनाला अहवाल सादर करा; शेतकऱ्यांची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गात बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोक्यात आले आहे. शासनाने अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या हवामानामुळे काजू आंबा पिक बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्यासह तालुक्यातील बागायतदार व व्यापारी प्रकाश विश्राम बोवलेकर, श्यामसुंदर राय यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे. दि. २३ पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बदललेल्या वातावरणाबाबत व झालेल्या अवकाळी पावसाबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा व ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नौद ऑनलाईन झालेली नाही त्यांची ऑफलाइन नोंद करण्याबाबत तलाठ्यांना त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Alphonso शेतकरी संकटात? हवामान बदलांचा गंभीर परिणाम; हापूसचा मोहोर करपला
या निवेदनाची दखल शासनाने घेतल्यास फळ बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. अचानक झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे सध्या झाडांवर काही प्रमाणात शिल्लक असलेली फळे गळून पडणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. याबाबत पालकमंत्री यांना देखील निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Alphonso शेतकरी संकटात?
कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर बंदा हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम झाल्याचे चित्र शिरगाव परिसरात दिसून येत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आलेला मोहर बदललेल्या वातावरणामुळे करपून गळाल्याने बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. उशिरापर्यंत लांबलेल्या पावसाळ्यानंतर अचानक वाढलेली थंडी आणि किमान तापमानातील तीव्र घसरण यामुळे आंब्याच्या बहरावर प्रतिकूल परिणाम झाला.
आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
यावर्षी थंडीचे प्रमाण चाढल्यामुळे तुडतुडा व क्षिप्स या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तापमानातील अचानक बदलामुळे नैसर्गिक परागीभवन प्रक्रियेत अडथळे निर्माण इाले. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून आंबा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून महागडी कीटकनाशके व औषधफवारणी केली, मात्र त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. कलमांची देखभाल, साफसफाई, खते, मशागत आणि मजुरीचा वाढता खर्च वामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, दरम्यान, कृषी विभागाने बाधित बागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.






