एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी राजभवनामध्ये घेतली मंत्रीपदाची शपथ घेतली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : Chhagan Bhujbal Marathi News :- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात अखेर मंत्रिपदाची माळ पडली आहे. राज्यामध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. मात्र अखेर त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवन येथे सकाळी १० वाजता शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात छगन भुजबळ यांना शपथ दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री छगन भुजबळ यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, ज्याच्या शेवट गोड ते सर्वच गोड आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत दिली आहे. त्याचबरोबर माध्यमांकडून भुजबळ यांना खात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत मंत्री भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील ते मान्य असेल, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “मी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे देखील धन्यवाद मानतो. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. मंत्रिपदाच्या ज्या जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री ठरवतील. 1991 पासून मी शपथ घेतो आहे. मंत्रिपद येत आहे आणि जात आहे. अनेक खाती सांभाळली आहे. यापुढे देखील जे खाते मिळेल ते सांभाळेल. विशेषतः नाशिक आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील विकासकामे करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे,” अशी भूमिका नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra | NCP leader Chhagan Bhujbal takes oath as a minister in the Maharashtra government at the Raj Bhavan.
Maharashtra CM Devendra Fadnavis, deputy CMs Eknath Shinde and Ajit Pawar also present. pic.twitter.com/hQ1eqtZrPr
— ANI (@ANI) May 20, 2025
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “येवला मतदारसंघामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी रडत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्री आणि इतर सर्वांशी बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काही मदत करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी कोणत्याही खात्याची अपेक्षा केलेली नाही,” असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भुजबळ यांनी त्यांना धन्यवाद सांगा असे हसून म्हणत भुजबळ यांनी टोला लगावला आहे.