'काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या'; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान पाटणा : राहुल गांधी नव्हे, तर केवळ प्रियांका गांधीच पक्ष अधिक चांगल्याप्रकारे चालवू शकतात, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत केले आहे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाटणा येथे माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात; त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत. राहुल गांधी पक्ष चालवणार नाहीत. फिरल्याने किंवा बुलेटने प्रवास केल्याने काही उपयोग होत नाही. राहुल गांधींनी नितीश कुमार यांना 'तडजोड केलेले नेते' म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून तेज प्रताप यादव यांनी हे वक्तव्य केले आहे. अलीकडेच, जद (यू) प्रमुख नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून पायउतार झाल्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, काँग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनीही पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, काँग्रेसमधील निर्णय केवळ राहुल गांधींच्या सांगण्यावरून घेतले जातात आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात आहे. राहुल गांधींना अनेक नेते मानत नाहीत बॉस शकील अहमद यांनी सांगितले, काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही. त्यांनी असाही आरोप केला की, नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे राहुल गांधी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेज प्रताप यादव आणि शकील अहमद यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतची अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
पाटणा : राहुल गांधी नव्हे, तर केवळ प्रियांका गांधीच पक्ष अधिक चांगल्याप्रकारे चालवू शकतात, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत केले आहे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाटणा येथे माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात; त्या इंदिरा गांधींसारख्या आहेत. राहुल गांधी पक्ष चालवणार नाहीत. फिरल्याने किंवा बुलेटने प्रवास केल्याने काही उपयोग होत नाही. राहुल गांधींनी नितीश कुमार यांना ‘तडजोड केलेले नेते’ म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून तेज प्रताप यादव यांनी हे वक्तव्य केले आहे. अलीकडेच, जद (यू) प्रमुख नितीश कुमार यांनी सक्रिय राजकारणातून पायउतार झाल्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले.
दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, काँग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनीही पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, काँग्रेसमधील निर्णय केवळ राहुल गांधींच्या सांगण्यावरून घेतले जातात आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले जात आहे.
राहुल गांधींना अनेक नेते मानत नाहीत बॉस
शकील अहमद यांनी सांगितले, काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही. त्यांनी असाही आरोप केला की, नेहरू-गांधी घराण्यातील असल्यामुळे राहुल गांधी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेज प्रताप यादव आणि शकील अहमद यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वाबाबतची अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाली आहे.






