रायगडच्या कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड कर्जत दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कारशेडसाठी टाकण्यात येणाऱ्या मातीच्या भरावामुळे पुराचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वावे, बेंडसे, भातगाव आणि बार्डी गावांमध्ये दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून हा भराव झाल्यास जनजीवन विस्कळीत होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रेल्वे आणि महसूल विभागाकडे तक्रारी करूनही एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापुराच्या पूर्वानुभवाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करूनच निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रायगडच्या कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड कर्जत दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कारशेडसाठी टाकण्यात येणाऱ्या मातीच्या भरावामुळे पुराचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वावे, बेंडसे, भातगाव आणि बार्डी गावांमध्ये दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून हा भराव झाल्यास जनजीवन विस्कळीत होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रेल्वे आणि महसूल विभागाकडे तक्रारी करूनही एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापुराच्या पूर्वानुभवाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करूनच निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.






