धर्मेंद्र प्रधान यांना तुरंत पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे। धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए। Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW. pic.twitter.com/6FRMMa8AI8 — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2026
देशभरातील ३ मे रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा पेपर देशभरात घेण्यात येणार होता. मात्र परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याने एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी यावरून सोशल मीडियावर व्हिडियो पोस्ट करत संताप व्यक्त केला. “NEET परीक्षेसाठी २२ लाख विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले, पण पेपरफुटीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. नरेंद्र मोदीजी, धर्मेंद प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवा आणि उत्तरदायी राहा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
“तर मी राजीनामा द्यायला तयार,” मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण् विखे पाटील यांचे मोठे विधान
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडियोत राहुल गांधी म्हणाले, “NEET परीक्षेसाठी २२ लाख विद्यार्थ्यानी २ वर्षे कठोर मेहनत घेतली. त्यांची मेहनत वाया गेली आहे. संपूर्ण देशाला माहित आहे कि परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सअँपवर प्रश्नपत्रिका वाटल्या जात होत्या. भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात कि माझे यात काही देणेघेणे नाही. कमिटीच्या शिफारशींना त्यांनी केराची टोपली दाखवली. विरोधी पक्षातील लोक हे कमिटीत बसले आहेत, याची काहीच गरज नाही असे ते म्हणाले. तुम्ही भारताचे जे मूळ आहे, त्याला क्षतिग्रस्त केले आहे. आरएसएस, भाजप, विद्यापीठांमध्ये बसवलेले यांचे लोक म्हणजेच कुलगुरू, प्राध्यापक यांच्यात पैसे कमावण्यासाठी बनवलेले हे एक मोठे जाळे आहे. आणि या जाळ्याने भारताच्या शिक्षण व्यवस्थेला संपवले आहे. संपूर्ण देशाला माहित आहे कि जर तुम्हाला कुलगुरू बनायचे असेल तर तुम्हाला अनुभव अथवा विषयातील ज्ञान याची कसलीच गरज नसून जर तुम्ही आरएसएसशी संबंधित असाल तर तुम्ही कुलगुरू बनू शकता. यामुळेच या देशात ८० वेळा पेपरफुटी झाली आहे. आणि २ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. प्रधानमंत्र्यांनी त्वरित आदेश द्यायला हवा कि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांना पदावरून हटवावे. आणि जे आरोपी आहेत त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे,” असे ते यावेळी म्हणाले.
“जसे मोदींचे एपस्टीनशी संबंध तसेच महाराष्ट्र भाजपचे खरातशी संबंध,” सुजात आंबेडकरांची जहरी टीका






